दुपारपर्यंत बीड तालुक्यातल्या पाच गावात केंद्राच्या पथकाने केली पाहणी
बीड (रिपोर्टर): उद्ध्वस्त झालेल्या बीडच्या शेतकर्यांच्या शेतातील पिकांची याची देही याची डोळा पाहणी करताना केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाला अक्षरश: नाकात दम आला. परिस्थिती इतकी बिकट की रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पाहणी करताना खुंटलेला पण हिरवा पाला असलेला कापूस पाहून पथकाला सब कुछ अच्छा दिखता होगा लेकीन यही तो नुकसान है, दस साल पहेले कपास छे से आठ फिट लंबा था, एक एक झाड को सौ से सव्वासौ दोड्या (बोंड) रहेते थे लेकीन इस साल कपास की लंबाई देढ फुट से साडे तीन फुट तक आ गई. जो हरा (हिरवं) दिखता है उस से तो किसान हारा है (पराजीत) हे केंद्रीय पथकासमोर मांडणे नितांत गरजेचे आहे. पाण्याची पातळी चारशे फुटापर्यंत गेल्याचे सांगणे केेंद्रिय पथकाला गरजेचे आहे, ते अनेक शेतकर्यांनी केंद्रीय पथकासमोर सांगितलं. विशेषत: बाजार समितीचे सदस्य धनंजय गुंदेकर यांनी पथकासमोर शेतकर्यांच्या पिडा मांडल्या आणि पाणी, चारा यासह अन्य मागण्या समोर ठेवल्या.
आज बीड जिल्ह्यात शेतकर्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्राची तीन सदस्यीय टीम बीडमध्ये डेरेदाखल झाली. सकाळी त्यांनी घोडका राजुरी, जरुड फाटा, मोरवड, पुसरा, कुप्पा, पोखरी येथे पाहणी केली. या तीन सदस्यीय समितीमध्ये नितीन आयोगाचे संशोधन अधिकारी एस.ए. मीना, एमआयडीसी सहाय्यक संचालक मोतीराम, अव्वर सचिव मनोज कुमार यांचा समावेश आहे. आज सकाळी त्यांनी शेतातील पिकांची पाहणी करण्यास सुरुवात केली. शेतकर्यांच्या रस्त्यावरील शेतात उभे राहून पीक पाहणी केली खरी परंतु शेतकर्यांच्या अडचणी काय, हे सांगणे नितांत गरजेचे. अवकाळी पावसाने कापसाला हिरवा पाला दिसत असला तरी वाढ खुंटलेल आहे, बोंडं नाहीत, उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे, शेतीच्या पाणीचे सोडा पाणी पातळी चारशे फुटाच्या खाली गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा एक ना अनेक अडचणी अखेर पोखरी येथे शेतकर्यांनी सांगितल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी अत्यंत विस्तृत माहिती समितीला दिली.
या वेळी समितीने प्रतिप्रश्नही गुंदेकरसह उपस्थित शेतकर्यांना केले. त्या प्रश्नांना उत्तरही या शेतकर्यांनी दिले. शेवटी जनावरांसाठी चारा, पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. बीड जिल्ह्यातला शेतकरी संकटात आहे हे उघड सत्य नाकारता येत नाही. समितीने नुसते पाहणी दौरे करून न जाता उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी होत आहे. या पथकासोबत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे, तहसीलदार सुहास हजारे आदी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
एस. ई. मीना जी किसान की हालत देखो
निती आयोगाचे संशोधन अधिकारी एस.सी. मीनाजी आप बीड तहसील के खेतो मे गए वहॉ की कपास, सोया, खरीप की फसल देखी, आपको कही पे हरा दिखता होगा, उस पे मत जाओ, कपास की उँचाई खुँटी है उसे मालही नही लगता, जमीन मे पाणी चासौ फिट निचे गया है, उत्पादन मे घट हो गई है, यहाँ का किसान बहोत परेशान है, आप उन्हे आपकी सहाय्यता की जरूरत है.