बीड (रिपोर्टर); संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सकल मराठ्यांचे नेते आहेत एकट्या अनिल जगतपांचे नाही त्यामुळे स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी मनोज ज रांगे पाटलांचे नाव अनिल जगताप यांनी वापरू नये असे आवाहन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी केले आहे
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तळागळा तील हिंदू सांठी शिवसेनेची स्थापना केली आहे या शिवसेनेत अनेक वेळा संधी देण्यात आली मात्र वेळोवेळी त्यांच्या पदरी कपाळ करंटे पणा चा पराभव झाला त्याचे कारण जगताप यांनी शिवसेनेचा वापर केवळ स्वतःच्या घरासाठी केला शिवसेनेत अनेक गोरगरीब कार्यकर्ते वर्षांनु वर्ष काम करत असताना अनिल जगताप गेली सोळा वर्षे जिल्हा प्रमुख पदावरून हटायला तयार नव्हते या पदाचा वापर ते कशासाठी करत आले हे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व महाराष्ट्रातील नेते मंडळीना चांगले माहीत आहे
अनिल जगताप यांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला अपंग करण्याचा आणि विरोधकांना रसद पुरवण्याचा केलेला उद्योग मा. पक्ष प्रमुख उद्धव साहेबानी ऐक, दोन वेळा दुर्लक्षित केला परंतु प्रत्येक वेळी शिवसेना विकण्याचा प्रयत्न एकदाचा हाणून पाडला गेला आहे
अनिल जगताप जिल्हा प्रमुख पदावरून काढण्या अगोदर तीन महिन्यांपासून मुंबईत कोणाच्या गाठी भेटी घेत होते हे सर्वांना माहीत आहे उद्याचा जगताप चा होणारा प्रवेश देखील नगर रोडच्या ऐका नेत्याच्या भविष्यातील राजकारणच प्याद म्हणून होत आहे हे सर्वांना माहीत आहे. जरागे पाटलांच्या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांतील मराठा तरुण तन मन आणि धन खर्चून सहभागी आहेत त्यामुळे एकट्या अनिल जगताप यांनी सुरू केलेला राजकीय कल्ला थांबवावा आणि सकल मराठा समाजाचे नेते जर जरंगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी झाले म्हणून जगताप यांना काढले असते तर मा पक्ष प्रमुख उद्धव साहेब यांनी सर्व सामान्य घरातील दोन मराठा तरुणांना जिल्हाप्रमुख केले नसते सकल मराठा समाजाचे नेते मनोज ज रागे पाटील यांचे नाव स्वतःच्या स्वार्थी राजकारण साठी वापरणे बंद करावे असे आवाहन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी केले आहे.