बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार जे जिल्ह्याचे रहिवासी आहेत आणि तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा त्यांची या जिल्ह्यात झाली आहे अशांची लोकसभा निवडणुकीपूर्वी बदली करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी चार उपजिल्हाधिकारी, एका तहसीलदाराची बदली करण्याची शिफारस प्रशासनाला केली आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी महसूल आणि विकास सेवेतील तीन वर्षापेक्षा जास्त काम केलेले आणि जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या अधिकार्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील उपजिल्हाधिकारी शरद झाडगे, परळीच्या उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, माजलगावच्या उपजिल्हाधिकारी निलीमा बाफना आणि भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सलगर आणि शिरूरचे तहसीलदार बिपीन पाटील यांच्या बदल्या करण्यात याव्यात, यामध्ये परळीच्या उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे या बीड जिल्ह्याच्या रहिवासी आहे तर इतर चार अधिकारी हे बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपेक्षा जास्त काम केलेले आहे त्यामुळे या पाच अधिकार्यांच्या बदल्या करण्याचे आदेश-शिफारस राज्य शासन आणि निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकार्यांनी केली आहे.