गढी (रिपोर्टर):- गेवराई तालुक्यातील मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात असलेल्या गढी ग्रामपंचायत चे तत्कालीन सरपंच अंकुश गायकवाड राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची निवडणूक लागली होती या निवडणुक प्रक्रियेत श्री विष्णुपंत घोंगडे यांचा एक अर्ज दाखल करून एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.आ.अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार हि निवडणूक पार पडली .या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्री.जितेंद्र लेंडाळ, तलाठी श्री.आर. बी सानप ,ग्रामसेवक श्री.तुकाराम घोलप यांनी काम पाहिले तर या निवडीची पूर्ण प्रक्रिया मंडळ अधिकारी श्री. जितेंद्र लेंडाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
यावेळी उपस्थित जय भवानी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ(जिजा)शिंदे,श्री कुमारभाऊ ढाकणे.संचालक श्री.जगन पाटील काळे,श्री. श्रीराम आरगडे,श्री.डॉ.चंद्रशेखर गवळी,बापूसाहेब ससाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक.श्री.मंगेश कांबळे,उपसपंच राजू पठाण श्री.बजरंग आरसुळ, श्री.विष्णुपंत घोंगडे,श्री.नाथ उगलमुगले, श्री.अशोक मोटे,श्री.श्रीचंद सिरसट,श्री.सुमित काळम,श्री.नवनाथ नाकाडे,अमोल ससाणे,डॉ.श्री.अनिल दहिफळे ,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.महेश सिकची ग्रामपंचायत कर्मचारी श्री.नारायण जाधव,श्री.मोहसीन पठाण, श्री. सखाराम पोहिकार, श्री. अण्णा ससाणे.पत्रकार शेख आसेफ,पोलीस कर्मचारी या, इसाक पठाण,रियाज जहागीरदार,यांसह गावातील आदी नागरिक उपस्थित होते.