रांजणगावच्या गणपतीची जरांगेंच्या हस्ते आरती, जल्लोषात स्वागत, मराठ्यांचा रात्रीचा मुक्कमी तळ चंदननगर
रांजणगाव (भागवत जाधव): जालना, बीड, नगर जिल्ह्यांची सीमा ओलांडत मराठे पुण्यात डेरेदाख झालेअसून आज त्यांचा मुक्कामी तळ हा खराहे बायपास चंदननगर असणार आहे. तत्पूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे रांजनगाव येथे भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध देवस्थान गणपतीचे त्यांनी दर्शन घेत त्याठिकाणी आरती केली. या वेळी अवघ्या रांजनगावात एक मराठा लाख मराठा च्या जयघोषाने दणाणून गेला. आंदोलनामध्ये मराठ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललली असून दोन दिवसात जरांगे हे मुंबईत डेरेदाखल होऊ पाहत आहेत. पोलीस प्रशासन या मोर्चाकडे लक्ष ठेवून आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषणाचा निर्धार केला. गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून त्यांनी मराठ्यांसह मुंबईकडे कूच केली. जालना, बीड, नगर जिल्ह्याच्या सीमा ओलांडत मराठे पुण्याच्या सीमेत डेरेदाखल झाले आहेत. आज सकाळी मनोज जरांगे यांचे रांजणगाव येथे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. मराठ्यांच्या या मोर्चात गावची शिव बदलली की, मराठे वाढताना दिसून येत आहेत. पुण्यामध्ये ही संख्या अधिक वाढली असून तब्बल 30 ते 45 कि.मी. एकपदरी रस्त्यावर नुसते मराठे आणि भगवे ध्वज पहायला मिळत आहेत. रांजणगावच्या गणपतीचे जरांगे यांनी दर्शन घेत त्याठिकाणी आरती करून जरांगे पुढे निघाले असून दुपारचे जेवण हे भीमा कोरेगाव याठिकाणी योजिले आहे. तर रात्रीचा मुक्काम हा खराडी बायपास चंदननगर या ठिकाणी करण्यात येणार आहे.