आ.सोळंकेंनी मध्यस्थी करून तहसीलदारांना बाहेर सुखरूप काढले.
माजलगाव (रिपोर्टर): तालुक्यातील महातपुरी सुलतानपूर येथील गोदावरी नदीवर पाणी उपश्यासाठी बसवलेल्या मोटार काढण्यावरून गावकरी आणि तहसीलदारात बुधवार दि 10 रोजी पहाटे मोठा राडा झाला.यादरम्यान आख्या गावाने एक होत सुमारे पाच तास तहसीलदाराचा ताफा रोखून धरला होता.या आणीबाणीच्या प्रसंगी आ.प्रकाश सोळंके यांनी गावकर्याची समजूत काढत मध्यस्थी करून तहसीलदारांना सुखरूप बाहेर काढले.
गतवर्षी पावसाळा कमी झाल्याने जिल्ह्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची जपवनुक करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यातच शेतीसाठी नदीकाठ गंगा काठावरून केला जाणारा पाण्याच्या उपशावरही नियंत्रण ठेवणे सुरू केले आहे.याच कामासाठी माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे आपल्या ताफ्यासह महादपुरी येथे गंगा काठी गेल्या होत्या.यावेळी त्यांनी नदीवर असणार्या विद्युत मोटरी काढण्यासाठी सुरुवात केली.
दरम्यान या बाबीचा गावकर्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. दिवस-रात्र नदीतून होणारा वाळू उपसा आपल्याला दिसत नाही. मात्र शेतकरी आपल्या शेतीसाठी थोडं पाणी घेत असल तर आपण आडवे येता.वाढता विरोध होत असल्याने तहसीलदारांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा यावेळी बोलावून घेतला.विरोध होत असल्याने पोलिसांकडून काही वयोवृद्ध शेतकर्यांना मारहाण करण्यात आली अशी माहिती येथील उपस्थित शेतकर्यांनी सांगितली.यामुळे गावकर्यात आणि तहसीलदारात मोठा वाद निर्माण झाला.पहाटे 6 वाजल्या पासून महिला पुरुष आबालवृद्ध गावकर्यांनी तहसीलदारांच्या गाडीला गोदा पात्रातच अडवून धरले होते.यावेळी मोठा राडा सुरू झाला.दरम्यान या घटनेची माहिती आ.प्रकाश सोळंके यांना होतात ते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी गावकर्यांची समजूत काढली.व मध्यस्थी करत तहसीलदारांना बाहेर काढले.
सुशील सोळंके,जयदत्त नरवडे यांची मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची ठरली.
तहसीलदारांनी गोदापात्रात सुमारे 30 ते 40 विद्युत मोटर जप्त करण्याची कार्यवाही चालू होती. अगोदरच शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे.ही बाब लक्षात घेता पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशील सोळंके व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी शेतकर्यांची बाजू लावून धरली. तहसीलदारांना विनंती केली. प्रसंगी कठोर ही झाले.
परंतु ते ऐकत नसल्याचे पाहून आमदारांना फोन केला.व शेतकर्यांच्या जप्त होणार्या मोटार वाचवल्या.त्यामुळे येथील शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.