किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील उंबरेवाडी येथील तरुण शेतकरी सूर्यकांत खोत वय 40 वर्ष यांनी आज सकाळी झाडाला गळफास घेऊन आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून धारूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे तरीसुद्धा पंचनामे झाले नसून शेतकर्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकरी पूर्णतः आर्थिक संकटात सापडले आहेत हे आर्थिक विवंचनेतून उमरेवाडी येथील शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे या शेतकर्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे त्यांच्यावर उमरेवाडी येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे.
आता तरी शासनाला जाग येईल का त्वरित धारूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांची पंचनामे करून त्यांना मदत द्यावी जेणेकरून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या सारखे पाऊल शेतकरी उचलणार नाहीत.