कोर्टाकडून 4 दिवसांची कोठाडी, वडवणी पोलीसांची कामगिरी
वडवणी (रिपोर्टर):- पाच महिन्यापुर्वी अंतर जातीय विवाह झालेल्या विवाहितेचा जाळून मारल्याची घटना वडवणी शहरातील साळींबा रोड भागात घडली होती.या प्रकरणात पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेव्हा पासून वडवणी पोलीसांना आरोपी हाती लागत नव्हता.परंतु पाच महिन्याच्या प्रदिर्घ काळानंतर पोलीसांनी आरोपीला कर्नाटक राज्यातील हर्ष साखर कारखाना येथून दि.10 फेब्रुवारी रोजी बेड्या ठोकल्या आहेत.तर आरोपीला कोर्टात हजर केले आसता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मयत अंजूम शेख (वय-25 वर्ष) रा.माजलगांव व बळीराम राजाभाऊ इचके (वय-28 वर्ष ) रा.उपळी यांची ओळख ऊस तोडणी कारखान्यावर झाली आणि यांचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी हि अंतर जातीय विवाह केला होता.तर वडवणी शहरातील साळींबा रोड भागात किरायाचा घरात वास्तव करत होते.पाच महिन्यापुर्वी दि.15 संप्टेबर 2022 रोजी दोघांमध्ये घरगुती किरकोळ वाद झाला होता. यात बळीराम इचके यांना राग अनावर न झाल्याने पत्नी अजूंम शेख हिच्यावर डिसेल टाकून पेटवून दिले होते. यामध्ये अंजूम शेख हि गंभीर स्वरुपात भाजली असल्याने जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारासाठी दाखल केले आसता.वडवणी पोलीसांनी अजूंम शेख हिचा जबाब नोंदवला आसता म्हणाली होती कि, दोघांमध्ये घरगुती किरकोळ वाद होऊन सदरील प्रकार घडला आहे.यानंतर दोन दिवसानंतर अंजूम शेख यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आणि वडवणी पोलीसात बळीराम राजाभाऊ ईचके यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेव्हा पासून पोलीसांना गुगली देत राजाभाऊ इचके फरार होता.घटना होऊन पाच महिने झाल्यानंतर वडवणी पोलीसांनी कर्नाटक राज्यातून हर्ष साखर कारखाना येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत.आरोपीला वडवणी न्यायालयापुढे हजर केले आसता चार दिवसांची पोलीस कोठाडी देण्यात आली आहे.अशी माहिती वडवणी पोलीस पोलीस स्टेशनचे एपीआय आनंद कांगुणे यांनी दै.रिपोर्टरला दिली आहे. तर यांच्यासह पो.ह.तांदळे, पो.ह.क्षीरसागर,पोलीस नाईक खरात यांनी विशेष परिश्रम घेतले असून या कामगिरीचे वडवणी पोलीसांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.