परळी (रिपोर्टर) परळी शहर व तालुक्यात अवकाळी पावसाने शनिवारी हजर लावली या अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचा मोठे नुकसान झाले असून यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
परळी तालुक्यात शनिवारी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली एक दिवसापूर्वी अवकाळी पावसाने शेतकर्यांचे उरात धडधड वाढली असतानाच शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्यांच्या आंबा, कांदा, ज्वारी, हरभरा यांच्यासह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली आहे.
गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान
शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यातील देशमुख टाकळी, शिरसाळा, पांगरी, वडखेल, कौठळी, गाढे पिंपळगाव, इंजेगाव, वाका, रेवली या गावातील आंबा ज्वारी हरभरा तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास गारपिटने हिसकावून घेतल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बळीराजा आता चिंतेने ग्रासला आहे.