मुंबई (रिपोर्टर) राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अपमान केल्यामुळे भाजप राज्यात सावरकर गौरव यात्रा काढत आहे. यात्रेच्या माध्यमातून भाजप विरोधकांवर टीका करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार या यात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल करत आहेत. विरोधकांनी भाजपच्या यात्रेवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत तुकोबा आणि इतर थोर महापुरूषांचा अपमान झाला तेव्हा गौरव यात्रा का काढली नाही, असा सवाल विरोधक करत आहेत.
काल नागपूर येथे झालेल्या गौरव यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे भाजप नेते सुधांशू त्रिवेदी व्यासपिठावर होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बावनकुळे एबीपी माझावर बोलत होते.