बीड(रिपोर्टर)ः- ऊसतोड कामगारांच्या योजना, त्यांना देण्यात येणारा विमा हे प्रश्न सोडवण्यासाठी गावातील ग्रामसेवकांने जागृकतेने ऊसतोड कामगारांची नोंदणी करावी. सोबतच ऊसतोड कामगारांच्या संघटनांनीही याबाबीकडे प्राध्यानाने लक्ष दयावे असे मत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी केले. ते आज बीड तालुक्यातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगारांच्यावतीने ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळाच्यावतीने ऊसतोड कामगारांना विविध सुविधा पुरविले जात आहे. ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्यात येत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांच्या हस्ते बबन माने यांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मौजे भाळवणी तालुका जिल्हा बीड येथे श्रीमती दीपा मुधोळ (मुंडे ) जिल्हाधिकारी बीड तथा जय महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप करण्याचा आले . याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड रवींद्र शिंदे , तहसलिदार सुहास हजारे, अनिरुद्ध सानप गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड, हभप गुरसाळे महाराज उपाध्यक्ष जय महाराष्ट्र उसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य ,विश्वास पाटील,सुवर्णा निंबाळकर, विश्वास बहिटवाळ, प्रा पंडित शेंडगे तथा ग्रामसेवक,तलाठी, सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य , वाहतूकदार , मुकादम , चालक-मालक, ऊसतोड कामगार यांच्यासह आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.