बीड (रिपोर्टर): पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान आळंदी येथे वारक-यांवर लाठीहल्ला प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच आषाढी वारीनिमित्त वारकर्यांना पालखी मुक्कामी गावात निवा-याची सोय,पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालये आदिं मुलभूत सुविधांची सोय व्हावी तसेच पालखीमार्ग पैठण-पंढरपुर तसेच खामगाव पंढरपूर यांची दुरावस्था असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भेगाळलेले व रखडलेले राष्ट्रीय महामार्ग प्रकरणात आवश्यक उपाययोजना
करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.19जुन सोमवार रोजी शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय ज्ञानोबा-तुकाराम माऊलींचा जयघोष करत पालखीसह पायी दिंडी काढण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन दिले.
यावेळी दिंडीत भगवान मोरे, दामोदर थोरात,बाळकृष्ण थोरात,श्रीहरी निर्मळ, रामचंद्र मुळे, अँड.गणेश वाणी, महादेव कुदळे, शेख युनुस, बलभीम उबाळे अशोक येडे, रमेश गायकवाड, तुकाराम गायकवाड, तुळशीराम पवार ,बाबा गायकवाड, संभाजी कोटुळे, संजय पावले, धनंजय सानप , राहुल थिटे, संजय जायभाये, दिपक बांगर,वनवे कालिदास,सानप अशोक, प्रदिप नेवळे,आंधळे मच्छिंद्र आदि सहभागी होते . आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांनी सरकारचे हिंदुत्व केवळ बेगडी असुन मतदानासाठी आहे अन्यथा वारकरी संप्रदायावर लाठीहल्ला करण्या-यांना पाठीशी घालत असुन याचे परीणाम सरकारला भोगावे लागतील आम आदमी पार्टी या हल्ल्याचा तिव्र निषेध करत आहे.दिंडीत आपचे बीड जिल्हा सचिव रामधन रामधन जमाले,प्रदिप अवसरमल, दादासाहेब सोनवणे, रामेश्वर गव्हाणे,विक्रम नागरगोजे, रामभाऊ शेरकर सहभागी होते.