मुंबई (रिपोर्टर) माझा पक्ष हा पितृपक्ष आहे, कारण माझ्या पिताने स्थापन केला आहे. शिवसेना स्थापनेवेळी माझे वय 6 वर्ष होते. 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले. पक्षासाठी वार झेलणार्यांना विनम्र अभिवादन करत असून आईचे दुध विकणारा शिवसेनेत नको असे रोखठोक वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज ठाकरे यांनी ऑनलाईन शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, 56 वर्षामध्ये शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून पक्ष वाढवला. पक्षासाठी वार झेलणार्यांना प्रथम विनम्र अभिवादन करत आहे. शिवसेनेमध्ये गद्दारी खपवून घेतली जाणारा नाही. आईचे दुध विकणारा शिवसेनेत नको असे रोखठोक बोलत ठाकरे पुढे म्हणाले की, उद्या निवडणूक आहे, मला त्याची चिंता नाही, जर मी चिंता करत बसलो तर जे शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमण्यामध्ये विनवलेले आहे त्याचा उपयोग काय, हार जीत होत असते, उद्या जिंकणारच आहोत, राज्यसभेत आमचे एकही मत फुटलेले नाही. कोणी काय कलाकारी केली ते माहितेय त्यामुळे मला उद्या फाटाफूटीची शक्यता वाटत नाही. शिवसेनेच्या स्थापनेवेळी जो नारळ फोडला गेला त्याचे शिंतोडे माझ्यावर उडाले. ही जबाबदारी किती मोठी असू शकते हे मला तेव्हा माहित नव्हते. शिवसेना प्रमुखानंतर नेतृत्व कोण करणार? यांना आपण जोरदार उत्तर देतोय असेही ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.