शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या
बीडमध्ये शिवसंग्रामचे धरणे; केज, नेकनूरमध्ये रास्ता रोको
बीड/केज/नेकनूर(रिपोर्टर) :- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने एक महिना दडी मारली. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांना विम्याचा पन्नास टक्के लाभ मिळावा, बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागणीसाठी आज शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच केज येथे उद्घव बाळासाहेब ठाकरे सेनेने रस्ता रोको आंदोलन केले. नेकनुर या ठिकाणीही रस्ता रोखो आंदोलन करण्यात आला.
ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेला. पाण्याअभावी पिकांची होरपळ झाली. सोयाबीन, कापुस, बाजरी, मका, मुग, उडिद इत्यादी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. शेतकर्यांना मोठी आर्थीक मदत करण्यात यावी. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागणीसाठी आज शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी कर्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नेकनूर येथेही शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्यात आले. एक तास रास्ता रोको आंदोलन झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद साजेद, शिवाजी शिंदे, सय्यद खालेद, इजहारोद्दीन जहागीरदार, शेख सज्जाद यांच्यासह आदींची उपस्थिती होती. केज शहरामध्ये देखील उद्धव बाळासाहेब सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. हे आंदोलन नैना सिरसट आणि रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाले. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आले.