ऐन रब्बी हंगामात कृषी विक्रते संपावर
विधेयकातील जाचक अटी नियम रद्द करा
आष्टी ( रिपोर्टर):-राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकातील काही नियम जाचक असून त्या विरोधात पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सहभागी होत आष्टी तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आजचा तिसरा दिवस ही तालुक्यातील सर्व कृषी दुकाने कडकडीत बंद पाळण्यात येत असुन संबंधित नियम व जाचक अटींच्या निषेधार्थ निदर्शने करत कृषी विक्रेते यांच्याकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयक क्रमांक 40,41,42,43, व 44 मधील कृषी विक्रेत्यांना बाधा आणणार्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी, व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र ऐन रब्बी हंगामात येत्या दोन ते चार नोव्हेंबर असा तीन दिवसाचा बंद पाळून राज्य शासनाच्या कायद्याचा निषेध नोंदवला आहे. या संदर्भात आष्टी तालुका कृषी निविष्ठा विक्री संघटना आष्टी, यांनी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी आष्टी, तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती आष्टी, तहसीलदार आष्टी, तसेच मा. आ. सुरेश धस, व मा. आ. बाळासाहेब आजबे यांना निवेदन दिले आहे.राज्य सरकारने नवीन प्रस्तावित कायद्यात कृषी दुकानांसंदर्भात काही जाचक अटी आणि नियम लागू करण्याचे ठरवले असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांचे म्हणणे आहे. संबंधित जाचक अटी आणि नियमांच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी केंद्र दोन ते चार नोव्हेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहेत.आष्टी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचाही यात समावेश आहे.राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या पाच विधेयका विरोधात हा संप असून या विधेयकातील तरतुदी कृषी विक्रेत्यांसाठी अडचणीच्या आहेत.विक्रेत्यांना सीलबंद तसेच पॅकिंग केलेल्या कृषी निविष्ठांच्या दर्जाबाबत दोषी धरण्यात येवू नये, असे म्हणणे आहे. या विधेयकाचा फेरविचार करावा महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीसाठी राज्य सरकारचा निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली यावेळी आष्टी तालुका कृषी संघटना आष्टी तालुका अध्यक्ष – अशोक तळेकर सचीव – अमोल झगडे, संपत शेळके विक्रम नरवडे प्रवीण चौधरी अनिल मेहेर महेश जोशी कीरण पठारे बुवासाहेब महाजन सुरेश खेडकर गणेश बळे तुषार राऊत संभाजी रेडेकर संपत भोसले शरद मुटकुळे धनंजय खिलारे बाळासाहेब साळवे कृष्णा मुळे अनिष राजमाने ऋषिकेश बोडखे आजय धोंडे काका पाथरकर सतीष तोतरे अमोल तळेकर औदूंबर निभोरे केतन पोकळे हरीदास भवर यशपाल रेडेकर रवींद्र झीजर्के गणेश आजबे विकास पवार विवेक देवकर भाऊसाहेब करांडे कैलास गव्हाणे रामेश्वर खाकाळ शिवलाल कटारीया अनील करांडे सचीन पुणेकर बालाजी वारंगुळे आदी विक्रेते उपस्थित होते.