आरोग्य कर्मचार्यांचे धरणे आंदोलन
शेतकर्यांच्या प्रश्नासाठी समाजसेवकांचे धरणे
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांना अग्रीमची रक्कम मिळाली नाही, ती तात्काळ देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांनी तीव्र निदर्शने केली तर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या संदर्भात समाजसेवकांनी आगळेवेगळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या कर्मचार्यांनी कामबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एकूणच या सर्व आंदोलनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
शेतकर्यांना सोयाबीन अग्रीम मंजूर करण्यात आले आहे. मात्र याचा सर्व शेतकर्यांना लाभ मिळाला नाही. अग्रीम सर्व शेतकर्यांना देण्यात यावे, 2020 चा पीकविमा, 2022 चे अतिवृष्टी सहाय्य अनुदान रखडलेले आहे, ते तात्काळ द्यावे, या मागण्यांसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांनी तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती. दुसरे आंदोलन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये होत असून शासनाने आधी शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे नंतर ‘शासन आपल्या दारी’ असे कार्यक्रम राबवावेत, ‘पुढार्यांची तर्हा न्यारी म्हणे शासन आपल्या दारी’ अशा आशयाचे बॅनर लावून आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. गणेश ढवळेंसह आदींची उपस्थिती होती. तिसरे आंदोलन महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी यांचे सुरू आहे. या कर्मचार्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे, सदरील कंत्राटी कर्मचार्यांनी आपले कामकाज बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. हे आंदोलन आयटकच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. यात राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटना यांचा देखील सहभाग आहे. या आंदोलनात अनेक कर्मचारी उपस्थित होते.