आष्टी (रिपोर्टर):-
अनुसूचित जाती आणि जमाती अर्थात एससी आणि एसटी आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. विविध संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे.आष्टी शहरासह तालुक्यात भारत बंदच्या हाकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला या भारत बंदवेळी कोणताही तणाव किंवा चुकीची घटना घडू नये, यासाठी आष्टी त पोलीस फौजफाटा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.तालुक्यातील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवून पुकारलेल्या बंदला प्रतिसाद दिला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.आष्टी तहसिलदार यांना सर्व जाती जमाती सर्व आंबेडकर वादी, संविधान प्रेमी,संघटना आष्टी तालुका यांनी निवेदन देऊन केंद्र सरकारने अनु जाती जमातीचे आरक्षण पूर्ववत ठेवण्याचा व क्रिमी लेयर आरक्षणात वर्गीकरण न करण्याचा कायदा संमत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
आज बुधवार दि.21 ऑगस्ट 2024 रोजी देशात भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. एससी / एसटी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला होता. एससी एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिले आणि त्याविरोधातच ही भारत बंदची हाक देण्यात आली. संघटनांच्या म्हणण्यानुसार एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाचा हा निर्णय धोक्याचा ठरू शकतो. किंबहुना हा निकालच सामाजिक न्यायसंहितेच्या सिद्धांतांविरोधात असल्याचा सूर या संघटनांनी आळवला आहे. या बंदला आष्टी शहरासह तालुक्यात प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने कडकडीत बंद होते.आष्टी शहरातील बुद्ध विहारापासून रॅली ला सुरुवात डॉ.आंबेडकर चौक,किनारा चौक,शनि चौक मार्गे तहसिल कार्यालयावर काढून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.आंदोलकांनी निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली काढून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले महिलांचा ही मोठ्या संख्येने सहभाग होता.