विष ओकणार्या राणेंच्या पाठीमागे कोण? -भास्कर जाधव
एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवतोय, नागपूर हिंसाचारावरून प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
मुंबई (रिपोर्टर): महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे. असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधार्यांवर निशाणा साधला आहे. हा एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत अफवांकडे लक्ष न देण्याचा आवाहनही त्यांनी केलंय. तर दुसरीकडे भास्कर जाधवांनी नितेश राणे यांचा बोलवता धनी कोण? असे म्हणत राणेंमुळेच दंगल भडकल्याचे म्हटले तर विजय वडेट्टीवार यांच्यासह दानवे यांनीही आक्रमकपणे राणेंवर टीका केली.
औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या विधानभवनाच्या पायर्यांवर सत्ताधार्यांचे जोरदार आंदोलन होत आहे. दरम्यान, नागपूर दंगलीवरून विरोधकांकडून सत्ताधार्यांवर प्रहार होताना दिसतोय. गृहमंत्री नागपूरचे असताना दंगल होतेच कशी असा सवाल करत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घेरले आहे. नागपूरची दंगल हा सूनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत असल्याचं ड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. (झीरज्ञरीह -ालशवज्ञरी)
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे. हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा. ड. आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही म्हटलं .
छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले .सोमवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला .यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली .जमा व पांगवण्यासाठी गेलेल्या कर्तव्यपथावरील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील अनेकांना जबर मार बसला. यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आता या संपूर्ण भागात जमावबंदी व संचारबंदी लावण्यात आली आहे.
नागपूरमधील सुनियोजीत पॅटर्न, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाही -सीएम फडणवीस
सकाळची एक घटना घडल्यानंतर पुर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपुर्वक असा हल्ला केल्याचे समोर येत आहे. कारण जवळपास एक ट्रॉली भरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरात दगड जमा केलेले पहायला मिळाले. शस्त्र मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. ठरवून काही घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे काही लोकांचा सुनियोजीत पॅटर्न दिसत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी विधानसभेत निवेदन केले. पोलिसांना पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. 33 पोलीस यात जखमी आहेत. पाच नागरिकांचा समावेश आहे, तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस जखमी आहेत. पोलिसांवर हल्ला करणारे जे कोणी आहेत, त्यांना सोडणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.