बीड, (रिपोर्टर)- 2 लाख रूपयांची मध्यस्ती केल्याच्या कारणावरून एका 60 वर्षीय वृध्दास तिघांजणांनी अंबा कारखान्यावर बोलावून अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबाजोागाई ग्रामीण पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानोबा केंद्रे यांनी 2 लाख रूपयांच्या व्यवहारात मध्यस्ती केली होती. सदरील हे 2 लाख रूपये संबधीतांना परत गेले नसल्याने धनराज तिडके, राम तिडके, नवनाथ तिडके (सर्व रा. तिघोळ अंबा) या तिघांनी ज्ञानोबा केंद्रे यांना अंबा कारखान्यावर बोलावून त्यांना एका गाडीमध्ये नेवून अपहरण केले. या प्रकरणी बन्सी ज्ञानोबा केंद्र रा.उंबराई यांच्या फिर्यादीवरून तिघां जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.