उमेदवारी पंकजांना की प्रितमला ते पक्ष ठरवील -दानवे
बीड (रिपोर्टर): इ.स. 1995-96 साली मान्यता प्राप्त झालेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला स्व. गोपीनाथराव मुंडेंमुळे गती मिळाली. 2014 नंतर गोपीनाथरावांनी लोकसभेत ही मागणी लावून धरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मार्गावर बजेट टाकले. आता 99 टक्के जमीन हस्तांतरीत झाली असून मध्यंतरी राज्यात सत्तांतर झाल्याने रेल्वेला पैसे देण्यात आले नाही. मात्र आता राज्यात आपले सरकार आहे. त्यांनी 400 कोटी दिले. त्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत रेल्वे बीडपर्यंत तर 2025 पर्यंत ही रेल्वे थेट परळीत जावून धडकेल, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले. अद्याप कुणाचीही उमेदवारी निश्चित झाली नसून पार्लमेंट बोर्डाचा उमेदवारीबाबत जो निर्णय असेल तो आम्हा सर्वांना मान्य असेल. उमेदवारीबाबत पार्लमेंट बोर्डच निर्णय घेतं, असेही दानवेंनी या वेळी म्हटलं.
ते आज बीड दौर्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे बोर्डाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्या सोबत केंद्रिय अर्थराज्यमंत्री कराड, खा. प्रितम मुंडे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दानवे म्हणाले की, या रेल्वे मार्गाचे भुसंपादनाचे काम ही 99 टक्के झाले आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी पैसा आणि जमिनही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असे दानवेंनी सांगितले.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वे म मंत्री दानवे, अर्थराज्यमंत्री कराड, खा.प्रितम मुंडे, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग 1995-1996 ला मंजुर झाला. मात्र केंद्र आणि राज्य सरकार या कामासाठी पैसा उपलब्ध करून देत नव्हते. पण बीड लोकसभा मतदार संघातून भाजपाचे दिवंगत नेते स्व.गोपीनाथ मुंडे हे निवडून आले आणि या रेल्वे मार्गाच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळू लागला. नगर-बीड-परळी हा एकुण 261 कि.मी चा रेल्वे मार्ग असुन यासाठी जवळपास 4 हजार 800 कोटी रूपये खर्च येत आहे. या रेल्वे मार्गासाठी नगर पासुन बीडपर्यंतचे सर्व भुसंपादन पुर्ण झाले असुन 25 मार्च नंतर परळी कडुनही सिरसाळ्यापर्यत या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होणार आहे. नगरपाासुन ही या काम सुरू असुन डिसेंबर 2024 मध्ये बीडपर्यंत रेल्वे धावेण असे सांगत या रेल्वे मार्गावरील दोन मोठे पुल आणि परळी स्टेशन नजीकची जागा यामुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. त्या सोबतच परळी येथील थर्मल पॉवर स्टेशनने स्वतःच्या खर्चातून परळी स्टेशन पर्यंत एक रेल्वे पटरी तयार केली होती. या पटरीच्या दुरूस्तीसाठी थर्मल्ला रेल्वे बघायला 1 लाख 36 हजार वार्षीक भाडे देत होते. हे वार्षीक भाडे रद्द करावे अशी मागणी थर्मल पॉवर स्टेशनकडून वारंवार होती. या दोन तीन आडथळ्यामुळे काही काम धिम्या गतीने होत असल्याने ेआणि मध्यंतरी कोरोना साथीमुळे या कामात अडथळा आला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये डिसेंबर 2025 पर्यंत नगर-बीड-परळी रेल्वे धावेलच. या मार्गाच्या इलेक्ट्रीशयनला मंजुरी नव्हती मात्र तिही मंजुरी रेल्वे बोर्डाने दिली असुन त्याचेही काम 25 मार्च नंतर लगेचच सुरू होईल असे ही यावेळी दानवे यांनी सांगितले.
बीडची उमेदवारी पंकजा की प्रितम याचा निर्णय भाजप संसदीय बोर्ड घेईल
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. कोणत्या लोकसभा मतदार संघातून कोणी लढावे हे आम्हाला माहित नसते पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडतो. बीड लोकसभा मतदार संघातून डॉ.प्रितम मुंडे लढणार की पंकजा मुंडे हे आम्हाला काहीच माहिती नाही. मिही स्वतः जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे, संभाजीनगरमधून डॉ.भागवत कराड निवडणूक लढवण्यास तयार आहे मात्र प्रितम, पंकजा, मी किंवा कराड आमच्या सगळ्यांच्या बाबतीत भाजप संसदीय बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. त्यामुळे बीडमधून पंकजा लढणार की प्रितम हे भाजपीय सांसदीय पक्ष बोर्डालाच माहिती आहे.