आंबाजोगाई विभागाच्या कारवाईत एकाच दिवसात १८६ वीजचोरांचा पर्दाफाश
आंबाजोगाई, (रिपोर्टर) :
वीजहानी कमी करण्याच्या दृष्टिने अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात मंगळवारी (दि.१३ मे) राबविलेल्या विशेष महामोहीमेत महावितरणच्या आंबाजोगाई विभागातील सर्व उपविभागाच्या वीजचोरी बहूल भागात राबवलिेल्या धडक कारवाईत तब्बल १८६ आकडे बहाद्दरांना महावितरणने चांगलाच दणका दिला आहे. दिवसभर झालेल्या या कारवाईत आकडे टाकून वापरण्यात आलेल्या शेगडया, हीटर व केबल जप्त करण्यात आले.
नियमीत वीजबील भरणाऱ्या वीजग्राहकांना अखंडीत व योग्यदाबाचा वीजपुरवठा व्हावा या उद्देशाने प्रादेशिक कार्यालयाच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आंबाजांगाई विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांनी धडक मोहीम हाती घेतली असून जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यां विरोधात धडक कारवाई करण्याचे सर्व उपविभागांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि.१३) राबविलेल्या धडक कारवाईत विभागातील आकडे टाकून वीजवापरणाऱ्यांवर कारवाई करत आकडे मुक्त परिसर मोहिम राबविण्यात आली. या धडक मोहिमेत आंबाजोगाई उपविभागातील संशयास्पद अशा १६० वीजग्राहकांची तपासणी केली असता ६३ वीजग्राहक वीजचोरी करत असल्याचे आढळून आले.
तर तेलगाव उपविभागातील ६० वीजग्राहकांची तपासणी केली असता १७ वीजग्राहक, माजलगाव उपविभागातील ८७ वीजग्राहकांची तपासणी केली असता ३७ वीजग्राहक तसेच धारूर उपविभागातील २७ वीजग्राहकांची तपासणी केली असता १० वीजग्राहक वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. यासर्व वीजचोरांवरती वीजकायदा २००३ अनुसार कलम १३५ व १२६ अन्वये कारवाई करण्यात आली असून वीजचोरीच्या बिलाची व दंडाची बीले तयार करून देण्याची कारवाई सुरू असून दिलेली बिले न भरल्यास वीजचोरीचे गुन्हे गुन्हे दाखल करध्यात येणार आहेत. या धडक कारवाईत विभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यानी सहभाग नोंदवला. यापुढेही वीजचोरी विरोधातील मोहिम अधिक कडक स्वरूपात राबवली जाणार असून वीज कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.