शेतकरी व लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांचे आवाहन
बीड (रिपोर्टर): महायुती सरकार कडुन सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्यांना कर्जमाफी सह अनेक प्रलोभने दाखवली होती, तसेच लाडक्या बहिणींना पण 1500 रुपया वरून 2100 रुपये महिना करू असे आश्वासन दिलेले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाचा महायुती सरकारला विसर पडला. सत्तेवर आल्या नंतर महायुती सरकार सातत्याने शेतकर्यावर अन्याय करत असून जुलमी धोरणे राबवून देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. निवडणुकी पूर्वी ज्या फसव्या घोषणा केल्या त्या विरोधात उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी सांगितले आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही, मोफत वीज, पाणंद रस्ते, हर घर जल, हर घर छत या आश्वासनाकडे ही महायुती सरकारने कानाडोळा करीत दुर्लक्ष केले आहे, म्हणून या विसर भोळ्या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी शिवसेना पक्षाकडून क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारून आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दिनांक रोजी, सकाळी 11 वाजता, महालक्ष्मी चौक बीड बायपास जवळ संभाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी, भव्य रस्ता रोको करण्यात येणार आहे.
या रस्ता रोको आंदोलनास मोठया संख्येने शेतकरी, लाडक्या बहिणींनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक भाई संजय महाद्वार, जिल्हा संघटक नितीन धांडे, उपजिल्हाप्रमुख राजू महूवाले, हनुमान जगताप आशिष मस्के, सहसंघटक रतन गुजर, युवा सेना जिल्हा संघटक अभिषेक दिवे, महिला आघाडी जिल्हा संघटक मीरा ताई नवले विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे, कामगार आघाडीचे जिल्हा संघटक रवी वाघमारे, अल्पसंख्यांक आघाडीचे संघटक सय्यद नय्युम, शिव वाहतूक सेनेचे मशरू पठाण, सतीश परदेशी, दिलीप पवार, गणेश लोणकर, नवनाथ प्रभाळे, प्रदीप कोटुळे यांनी केले आहे.