
साठ वर्षात मिनी मंत्रालयाचे 33 अध्यक्ष
जगताप, ढाकणे, रांजवण,मुंडे यांना दोनदा अध्यक्ष होण्याची मिळाली संधी
मजीद शेख
बीड- महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली. राज्य स्थापन झाल्यानंतर स्थानिकच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणण्यात आल्या. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. ग्रामीण भागात स्थानिक संस्था महत्वपुर्ण मानल्या जात असतात. या संस्था म्हणजे ग्रामीण भागाच्या विकास वाहिन्याच आहेत. जिल्हा परिषदेची पहिली निवडणुक 1962 साली झाली. या निवडणुकीत बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी माजलगावचे सुंदरराव सोळंके यांची निवड करण्यात आली. सोळंके हे बीड जि.प.चे पहिले अध्यक्ष आहेत. त्यांना अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. जि.प.चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची पुढे राजकारण प्रगती होत गेली ते राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदा पर्यंत गेले होते. 1960 ते 2019 या 59 वर्षाच्या कालावधीत जि.प.चे 33 अध्यक्ष झाले.
स्थानिकच्या निवडणुकीचा जोर वाढू लागला. कार्यकर्ते कामाला लागले. स्थानिक निवडणुका ह्या कार्यकर्त्यासाठी महत्वपुर्ण मानल्या जात असतात. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर सुरु करण्यात आल्या. त्यात जि.प., पं.स,. न.प., ग्राम पंचायतीचा समावेश आहे. स्थानिक संस्थाच्या माध्यमातून ग्रामीण भागासह शहरी भागाचा विकास केला जात असतो. जिल्हा परिषद म्हणजे ‘मिनी मंत्रालयच’, जि.प.चा जो ही अध्यक्ष होत असतो. त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळत असतो. त्याच्या गाडीवर लाल दिवा असतो, त्यामुळे जि.प. च्या अध्यक्षपदाला खुप महत्व आहे. जि.प. चं अध्यक्षपद मिळवण्यासाठी प्रचंड रस्सीखेच होत असते. स्थानिकच्या पहिल्या निवडणुका 1962 साली झाल्या. या निवडणुकीत बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी माजलगावचे सुंदरराव सोळंके यांची निवड झाली. सोळंके यांना बीड जि.प.चा अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. त्यानंतर सोळंके यांची राजकारणात प्रगती होत गेली. ते उपमुख्यमंत्रीपदा पर्यंत पोहचले होते. 1960 ते 2019 या 59 वर्षाच्या कालावधीत जि.प.चे 33 अध्यक्ष झाले. 33 अध्यक्षामध्ये असराजी जगताप, एन.के. ढाकणे, रांजवण,पी.पी. मुंडे यांना दोनदा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली.तर किसनराव सोळंके यांना तिनदा अध्यक्ष पद मिळालं.
आता पर्यंत सहा महिलांना अध्यक्ष होण्याची संधी
1962 ते 2019 या दरम्यान, जि.प.चे 33 अध्यक्ष झाले. यात काहींना जास्त कालावधी तर काहींना कमी कलावधी मिळाला. 34 अध्यक्षापैकी सहा महिलांना अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. यामध्ये श्रीमती विद्याताई पवार (प्रभारी) सन- 14-2-1996 ते 16-8-1996, श्रीमती उषाताई दराडे सन17-8-1996 ते 20-3-1997, श्रीमती जी.एल मुंडे 21-3-1998 ते 20-3-1999, मीरा गांधले 21-3-2001 ते 29-11-2009, शोभा भरतराव पिंगळे 30-11-2009 ते 20-3-2012, सविता विजयकुमार गोल्हार 21-3-2017 ते 20-9-2019 या सहा महिला आता पर्यंत अध्यक्ष झालेल्या आहेत.








