बारामतीला राज्यात एक नंबर करण्यासाठी तुमची साध द्या -अजित पवार
तरुण पिढीला रोजगार देण्यासाठी एक येण्याची गरज -शरद पवार
बारामती (रिपोर्टर): नमो रोजगार मेळाव्यात शरद पवार, खा. सुप्रिया सुळे या मंचावर आहेत. त्यामुळे आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे आणि राजकारण विरहीत असल्याचे आणि त्याची प्रचीती ‘नमो रोजगार’ मेळाव्याच्या मंचावर येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. हे सरकार राजकारण करत नाही तर काम करत असल्याचे सांगून या वेळची पोलीस भरती ही मराठा आरक्षणासह होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती राज्याच्या विकासाचं मॉडल असणार आहे, असे म्हटले. तर तरुण पिढीला रोजगार देण्याची गरज आहे, त्यामुळे राजकारण सोडून तरुणांसाठी सर्वांनी एकत्रित यावं, असे शरद पवारांनी सांगितले. रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सुचीत केले असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी या मेळाव्याचे तोंडभरून कौतुक केले.
बारामतीत आज बहुचर्चित नमो रोजगार मेळावा झाला. या मेळाव्यासकहे अवघ्या राज्याचे लक्ष लागून होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे शरद पवार, खा. सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. या वेळी अजित पवार यांनी एक दिवस असा आणेन बारामती राज्यात एक नंबरचा तालुका असेल, मला तुमची साथ हवी आहे, असे उपस्थितांना त्यांनी आवाहन केले. मी फुशारकी मारत नाही पण बारामतीतील प्रत्येक इमारत बांधून होईपर्यंत चाळीस चाळीस वेळा भेटी दिल्या. करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर आपण त्या नादाला लागत नाही, राज्यातील विकास कामे करताना आपण मनापासून विकास कामे करतो. बारामती तालुका एक नंबरचा करण्यासाठी राज्यातील नेते साथ देतील, असे म्हणत कौशल्य रोजगार उद्योजक नाविन्यता विभागामार्फत हा मेळावा होता. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेले दोन-तीन दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे. माध्यमाचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या दोन-तीन दिवसात मिळवून दिली. हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे. महारोजगार मेळाव्यात 55 हजार पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. याचा अर्थ एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे. आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे, दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत, पण या दोघांना एकत्रित आणणारा कोणीतरी आवश्यक होतं.या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महा रोजगार मेळावा आयोजित केला. त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे.