बीड (रिपोर्टर): सोयाबीन, उडीद, मूग या पिकांसाठी विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम विमा रक्कम दिली आहे. ही 25 टक्के अग्रीम रक्कम जिल्ह्यातील विमा काढलेल्या काही शेतकर्यांना मिळाली असून अनेक शेतकरी या 25 यक्के अग्रीम रकमेपासून वंचित आहेत, त्यांनाही तात्काळ ही रक्कम देण्यात यावी, कापूस या पिकालाही विमा लागू करावा, एमएसईबीने तात्काळ जळालेला ट्रान्सफार्मर बदलून द्यावा यासाठी राज्य किसान सभेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या समवेत बैठक घेत असून यामुळे वंचित शेतकर्यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे.
राज्य किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला होता. मात्र कृषी विभाग आणि विद्युत विभाग यांच्याकडून प्रतिसाद मिलत नसल्याने बुरांडे यांनी ही बाब जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे मागणी केली. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी आणि विमा कंपनीचे अधिकारी यांच्या समवेत बैठक लावून हे प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रकमेपासून जे शेतकरी वंचीत आहेत त्यांच्या खात्यावर तात्काळ ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. सोबतच विद्युत वितरण विभागाच्या वतीने जळालेला ट्रान्सफार्मर महिना महिना दुरुस्त करून मिळत नाही त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे, तेही तात्काळ बदलून देण्याची मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आलेली आहे. जिल्हा पशूसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत अनेक बँका शेळी, गाय-म्हैस यांच्या प्रकरणाला मंजूरी देत नाही तेही निकाली काढण्यात यावे, याबाबतची मागणी असून या बैठकीला राज्य किसान सभेचे समन्वयक कॉ. अॅड. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. दत्ता डाके आणि कॉ. बडे, अॅड. सुभाष डाके आदी सहभागी आहेत.