बीड (रिपोर्टर): बीड नगरपालिकेचा अंधाधूंद कारभार सुरूच असून शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. वाढत्या घाणीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले. न.प. प्रशासकीय अधिकारी शहरवासियांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरीकात संताप व्यक्त केला जात आहे.
बीड शहरातील विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. शहर वार्यावर पडल्यासारखी अवस्था झाली. स्वच्छतेबाबत अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरीकांमध्ये निष्क्रीय अधिकार्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पांगरी रोड परिसरात तर दोन दिवसाला नालीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने त्याचा त्रास व्यापार्यांना सहन करावा लागत आहे. शहराच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून न.प.चे कान टोचावेत, अशी मागणी केली जात आहे.