माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टीत विराट सभा संपन्न; मतदारांचा प्रचंड उत्साह, विजयावर शिक्कामोर्तब!
आष्टी ( रिपोर्टर ):-खासदार निधी परत जात नसतो. हे सामान्य ज्ञान ज्या व्यक्तीला (विरोधी उमेदवारांना) माहित नाही. त्यांनी दिशाभुल करु नये.खासदार फंड लप्स होतच नसतो परंतु बेसीक ज्ञान त्यांना नाही हेच विशेष आहे.लोकनेत्या पंकजाताई सन्मानाने लोकसभेत जाण्यासाठी आपले सर्व लक्ष केंद्रित लोकसभा निवडणुकीवर केले पाहीजे.
पंकजाताई मुंडे निवडीसाठी आपण प्रभावी मतदार आहात त्यामुळे त्याला खिंडार पडण्याचे काम विरोधक करत आहेत.तस पाहिले तर निवडणूक खुप सोपी आहे कारण आपण सगळे केंद्र सरकारच्या कोणत्याना कोणत्या योजनेचे लाभार्थी आहोत.त्यामुळे अनेक विकास कामे आपण राबविले आहेत.त्यामुळे हे मतदारांना सांगितले पाहिजे असे सांगून अरे ला कारे म्हणायचे गरज नाही आपण केलेल्या विकास कामाना घेऊन आपण मतदान मागितले की,आपण नक्की विजयी होऊन सर्वाधिक लीड पंकजाताई यांना मिळून त्या विजयी होतील ’असा ठाम विश्वास खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी आज आष्टी येथील विराट सभेला संबोधित करताना व्यक्त केला.
भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आष्टी येथील मोरेश्वर लान्समध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आ.भीमराव धोंडे होते या सभेत माजी आ.भीमराव धोंडे ,माजी आ.गोविंदराव केंद्रे,दिलीपदादा हंबर्डे, सुधीर घुमरे, साहेबराव म्हस्के,अजयदादा धोंडे,वाल्मिकतात्या निकाळजे,डॉ.शिवाजीराव शेंडगे,विस्तारक हरीश खाडे,रामराव खेडकर,ड.रत्नदीप निकाळजे,भाऊसाहेब मेटे,बबनआण्णा झांबरे,रघुनाथ शिंदे,बबनराव औटे,रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,माऊली पानसंबळ,भाग्यश्री ढाकणे,माजी सभापती सौ. सुवर्णाताई लांबरुड,प्रकाश सोनसळे,दादा जगताप यांची भाषणे झाले तर यावेळी सभेला खा.डा.प्रितमताई मुंडे,माजी आ.गोविंदराव केंद्रे,विजय गोल्हार, सविताताई गोल्हार,सविताताई बडे,सुवर्णाताई लांबरुड,शैलेजा गर्जे अनुरध सानप,माऊली पानसंबळ,भाग्यश्री ढाकणे, शिवाजी नाकाडे,प्रकाश बडे,विठ्ठल बन्सोडे,अरुण सायकड,सईद चाऊस,विष्णूपंत वायभासे,अमोल चौधरी,मधुकर गर्जे,केदार जगताप,सतीशमामा झगडे,हरिभाऊ जंजीरे, तात्यासाहेब कदम,बाळासाहेब खिळे,प्रकाश कोकणे,पांडुरंग गावडे, सेवानिवृत्त नायब शाहादेव गिते,दिलीपराव काळे,ज्ञानदेव खिळे मुकादम,अभय गर्जे,बाबा ससाणे,बाळासाहेब वाघुले,बापुराव आव्हाड, विठ्ठलराव लांडगे आदि मान्यवर,पदाधिकारी मोठ्या संख्येने होते.