गेवराई (रिपोर्टर) चिंतेश्वर नगर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. गेवराई जि. बीड ही सामान्य सभासद यांनी एकत्र येऊन सण 1989 साली स्थापन केलेली संस्था असून यामध्ये बहुतांश सभासद हे शेतकरी आहेत. संस्था स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने महाराष्ट्र शासनाकडून कोणताही लाभ अथवा कर्ज घेतलेले नाही. तसेच संस्था स्थापनेपासून आजपर्यंत शासनाने नियुक्त केलेल्या पॅनलवरील लेखापरिक्षकांकडून दरवर्षी लेखा परीक्षण करून घेतलेले असून त्यामध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी आढळली नसून कायद्याच्या चौकटीत राहून संस्थेचा कारभार हा कायदेशीरच असून यात संस्थेची व माझी विनाकारण बदनामी होत असल्याचे चेअरमन राजेंद्र राक्षभुवनकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान काही लोकांच्या तक्रारीनुसार संस्थेची यापूर्वी तीन वेळेस मा. सहायक निबंधक बीड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. संस्थेने या तीनही चौकशीला सामोरे जाऊन, सहायक निबंधक गेवराई, जिल्हा उपनिबंधक बीड तसेच विभागीय सहनिबंधक संस्था लातूर यांच्याकडे अपील केले होते. या सर्व अपिलांचा निर्णय संस्थेच्या बाजूने लागलेला आहे. मी स्वतः संस्थेच्या स्थापनेपासून सभासद असून सभासदांच्या आग्रहाखातर माझी सर्वानुमते चेअरमनपदी जिल्हा उपनिबंधक बीड व सहायक निबंधक सहकारी संस्था गेवराई यांच्या परवानगीने कायदेशीर नियुक्ती झालेली असून या संस्थेत एकूण 36 सभासद असून त्यापैकी 34 सभासदांनी एकत्र येऊन जमीन विक्री करण्याबाबत एकमुखी निर्णय घेत तसा ठराव सभेमध्ये संमत करून शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून, सर्व सभासदांना विश्वासात घेऊन सदरील खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला. याबाबत संस्थेने जिल्हा उपनिबंधक बीड यांच्याकडे संस्थेची जमीन कायमस्वरूपी विक्री करण्याबाबत संमती मागण्याकरता प्रस्ताव दाखल केला होता. सदरील प्रस्ताव सहायक निबंधक सहकारी संस्था गेवराई यांच्याकडे निर्णयासाठी पाठवण्यात आला आसता सहायक निबंधक संस्था गेवराई यांनी आपल्या स्तरावर निर्णय घेण्याबाबत आमच्या संस्थेला परवानगी दिली. त्यानुसारच शासनाच्या सर्व अटी व शर्तीचे पालन करून सर्व व्यवहार पार पडला असून यामध्ये कोणताही गैर कारभार झालेला नसल्यामुळे कोणतीही गोष्ट लपण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या मते लोकशाही मध्ये सहकारी संस्थेत बहुमताला महत्व असून या नुसारच संस्थेच्या 36 पैकी तब्बल 34 सभासदांनी स्वखुशीने घेतलेला हा सामूहिक निर्णय असून याबद्दल काही राजकीय लोकांना आपली इचछाशक्ती पूर्ण करता आली नसल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास होऊन संस्थेच्या विरोधात आशा चुकीच्या बातम्या पसरवण्याचे विघ्नसंतोषी लोकांचे हेकट कारस्थान सर्व सामान्य जनता आणि सभासद हे पूर्वीपासूनच ओळखून आहेत. आशा भूलथापांना बळी पडून माझी विनाकारण बदनामी करणाऱ्या लोकांना लवकरच नियमानुसार कायदेशीर कारवाई संस्थेच्या वतीने आम्ही करणार आहोत. यामधील मुख्य तक्रारदार रमेश लाड व ईतरांनी सततच्या तक्रारी नंतर संस्थेच्या विषयी असलेले सर्व गैरसमज त्यांचे दूर होऊन संस्थेच्या कारभाराविषयी समाधानी होऊन संस्थेविरुद्धच्या सर्व तक्रारी मागे घेतल्या यास हातमिळवणी कसे म्हणता येईल.? उलट संस्थेच्या चांगल्या कारभाराला त्यांनी एकप्रकारे पाठिंबा दर्शवला यात गैर ते काय..? तर संस्थेचा जमिनीचा काही भाग हा राष्ट्रीय महामार्गात गेल्यामुळे संस्थेला शासनाचे आलेला 9 लाख 25 हजाराचा निधी आजही सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या परवानगीने बँकेत जमा आहे. यानंतर संस्थेच्या काही चुकीच्या कारभाराच्या विरोधात लोकशाहीच्या माध्यमातून कायदेशीररित्या दाद मागू शकता त्यास संस्था सक्षमपणे कायदेशीर उत्तर देण्यास बांधील आहे. मात्र या प्रकरणी कोणताही सक्षम पुरावा उपलब्ध नसताना माझी व संस्थेची विनाकारण बदनामी करण्यात येत असून याबाबत आम्ही लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संस्थेचे चेअरमन राजेंद्र राक्षसभुवनकर यांनी कळवले आहे.