बीड (रिपोर्टर)ः- मुख्यमंत्री वयोश्री योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विविध उपकरणे 65 वयोगटातील पुढील नागरीकांना मिळणार आहेत. त्यासाठी योजनेची जनजागृती करणे गरजेचे असतांना समाज कल्याण विभागाला मात्र याचे देणं ना घेणं नसल्याचे दिसुन येत आहे. कार्यालयातील अधिकारी नेमकं करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना लागु करण्यात आली आहे. यामध्ये 65 वयोगटातील नागरीकांना चष्मा, श्रवणयंत्रे, ट्रायपॉड, स्टीकव्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लबर वेस्ट, स्वायकर कॉलर इत्यादी उपकरणे मिळणार आहेत.सदरील हे उपकरणे खरेदी करण्यासाठी संबंधितांना 3 हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज करणे गरजेचे आहे. ही योजना सर्व सामान्य पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यांची जनजागृती करण्याचे काम अधिकार्याचे असुन अधिकारी फक्त कार्यालयात खुर्च्यावर बसण्याचे काम करत आहेत. कार्यालयात आलेल्या व्यक्तींना कर्मचार्यांसह अधिकारी व्यवस्थीत बोलत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.