होणारच…!उगीच गैरसमज नकोय..!
सकारात्मक काम करा..समीर काझी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, (रिपोर्टर)ः- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ अल्पसंख्याक समाजासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात साठी प्रयत्नशील आहे,आमखास मैदानावर फुटबॉल स्टेडियम व्हावे,म्हणून आम्ही कोणतीही काटकसर सोडणार नाही,माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या बाबत गैरसमज पसरवू नये,व चांगल्या व सकारात्मक कामात हातभार लावावा,तुम्ही गेल्या दहा वर्षे आमदार -खासदार होता,त्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा म्हणून आम्हाला मदत करावी,बिनबुडाचे आरोप व राजकारण करू नये,असे आवाहन वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी जलील यांना केले.
जलीलांना उशिरा जाग आली का?माहीत होतं,तरी राजकारण…
एक मे रोजी काही मेडिया व वर्तमान पत्रात आमखास मैदानावर अल्पसंख्यांक मंत्रालय अंतर्गत अल्पसंख्यांक आयुक्तालय, वक्फ मंडळ व मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यलयांच्या इमारतीसाठी खोदकाम सुरू केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या.माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमखास मैदान व वक्फ कार्यलयात येऊन अधिकार्यांना दम दिला,या वरून शहरात वक्फ मंडळ बाबत गैरसमज पसरला होता.या वरून मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी तातळीची पत्रकार परिषद घेत प्रकरणाची सत्य बाब उघडकीस आणली.ते म्हणाले ऑगस्ट 2024 मध्येच माजी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती.04 ऑक्टोबर 2024 ला राज्य शासनाच्या वतीने वक्फ बोर्ड,अल्पसंख्याक आयुक्तालय व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ इमारतींच्या खर्चाच्या अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली.06-डिसेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्क ऑर्डर काढली.ही बाब काही लपलेली नाही,जबाबदार नेता म्हणून माजी खासदारांनी त्या वेळेस विरोध का केला नाही?त्यांना उशिरा जाग आली की फक्त राजकारण करण्या साठी असला मुद्दा हाती घेतला?असा प्रश्न ही समीर काझी यांनी उपस्थित केला.
फुटबॉल स्टेडियमच्या जागेला कोणीच हाथ लावू शकता नाही
आमखास मैदानाची एकूण जागा 29.10 एकर आहे,पैकी 11 एकर जमी ही फुटबॉल स्टेडियम साठी आरक्षित आहे.त्या ठिकाणी भव्यदिव्य स्टेडियम व्हावे ही आमचीही ही इच्छा आहे.केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने हे स्टेडियम उभारले जाणार आहे.या बाबत जलील यांना कल्पना आहे.जागा स्टेडियम साठीच राखीव आहे,ते तीन वर्षे वक्फ सदस्य होते,त्यांना खडा न खडा माहिती आहे.म्हणून फुटबॉल स्टेडियमच्या जागेला आम्ही हाथ लावला,असा प्रश्नच उद्भवत नाही.
अजित पवार यांच्या सोबत बैठक,त्रुटी असल्यास चर्चा करू
गेल्या मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सोबत अल्पसंख्यांक विभागाची बैठक घेण्यात आली होती.बैठकीत दादांनी वक्फ मंडळ व इतर अल्पसंख्याक विभागांच्या कामकाजात गती आणण्यासाठी निधीची कमकरता भासणार नाही,असे आश्वासन दिले होते.पायाभूत सुविधा साठी ही वाढीव निधी मिळावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.येत्या पाच तारखेस मुंबईत परत अजित दादा यांनी बैठक आयोजित केली आहे.वक्फ बोर्डा मार्फत अल्पसंख्यांक समाजाला सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.कामात पारदर्शकता व समाजाचा विकास व्हावा हा आमचा उद्देश आहे.आमखास मैदानावर भव्यदिव्य स्टेडियम व्हावे या साठी आम्ही शासन कडे भरीव निधीची मागणी करू,तसेच वक्फ मंडळा कडून तीनही कार्यलयांना बैठक घेऊन रीतसर परवानगी देऊ,या बाबत अजित दादांशी चर्चा करू, असे अध्यक्ष समीर काझी यांनी सांगितले.
वक्फ मार्फत सर्वांगीण विकास साठी आम्ही प्रयत्नशील
येत्या पन्नास वर्षाचे लक्ष्य समोर ठेवून आम्ही वक्फ बोर्ड इमारत तयार करणार आहोत.मारक्तहवाद वक्फ बोर्डाच्या पणचक्कीत आज ही राज्याचा कारभार चालतो.जागा अपुरी आहेत म्हणून लोकांना सेवा देण्यास अडचणी येतात.त्यासाठी आम्ही राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय उभे केले.वक्फ उत्पन्नात दुपटीने वाढ केली.कंत्राटी भरती करून तब्बल शंभर अल्पसंख्याक युवकांना रोजगार दिला.गरीब लोकांना घर मिळावे म्हणून शासन कडे प्रस्ताव सादर केला.बारामती येथे उर्दू शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली.मुख्यालयाचे रेकॉर्डरूम अद्यावत केले.बीड येथे मेडिकल कॉलेज व्हावे म्हणून केंद्र व राज्य शासनाला कडे पाठपुरावा केला.गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी तब्बल दिड हजार संस्थांचे नोंदणी प्रकरण मंजूर केले.
———-





