आष्टी तालुक्यातील न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली अधिकारी कर्मचारी पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत कार्यकर्तांचे आरोप
आष्टी ( रिपोर्टर):- आष्टी मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत्याची नव्हती अतिवृष्टी झाली यामध्ये होत्याच नव्हते झाले अनेक घरांची पडझड झाली काहींना जिव गमवावा लागला,शेती उद्धवस्त झाली बंधारे वाहुन गेले, नदीवरील पुल वाहुन गेले तलावांची व पाझर तलावांची तात्काळ दुर करण्यात यावी व महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत विहरीची बंद असलेली कामे त्वरीत सुरु करावीत बंद असलेले मस्टर तात्काळ सुरू करण्यात यावेत यासाठी मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार पक्षाचे नेते मा.आ.भिमराव धोंडे,मा.आ.बाळासाहेब आजबे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शेतकरी यांचे तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
आष्टी,पाटोदा व शिरूर (का.) या तीनही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे अनेक बंधारे व पाझर तलाव उद्ध्वस्त झाले आहेत.याचा थेट परिणाम परिसरातील शेती व पाणी साठवण क्षमतेवर होत असून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र या गंभीर विषयाकडे संबंधित प्रशासन व जलसंधारण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी आ. भिमराव धोंडे यांनी व मा.आ.बाळासाहेब आजबे,केला आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या जलसिंचन व पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांनाही अद्याप सुरुवात झालेली नाही.त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात संताप व्यक्त होत आहे.या सर्व बाबी लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून विहिरींची दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी मागणी आ. भीमराव धोंडे व मा.आ.बाळासाहेब आजबे यांनी केली आहे. ठरलेल्या मुदतीत कामांना सुरुवात झाली नाही म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे,दिपक घुमरे,वनवे दादा, संभाजी जगताप, नियामत बेग,रत्नदीप निकाळजे, अशोक साळवे,संभाजी जगताप, हरिभाऊ दहातोंडे,भाऊसाहेब लटपटे, महेश आजबे,अभय धोंडे, यश आजबे,धैर्यशील थोरवे,अस्ताक शेख, भाऊसाहेब घुले, सरपंच राहून जगताप,दिलीप काळे, भाऊसाहेब घुले, सरपंच ज्ञानेश्वर वाघ, आदेश निमोणकर,बबन काळे, बबनराव औटे, हरिभाऊ जंजिरे, विश्वास नागरगोजे,बाबा ससाणे, बजरंग कर्डिले,मा.सरपंच जालिंदर गायकवाड,मा.सरपंच ज्ञानेश्वर गदादे,गौतम ससाणे, राजपाल शेंडगे,बबन काकडे,सनी काळकुंड, सरपंच भरत जाधव, सरपंच भाऊसाहेब कोकरे, सरपंच संजय विधाते, सरपंच बबन दादा डोके,पांडुरंग गावडे, अशोक खेडकर,कृष्णा मिसाळ,केदार जगताप,सावता परिषद युवक तालुकाध्यक्ष संपत सायकड,राजपाल शेंडगे, राहूल जगताप, सरपंच दादासाहेब जगताप , यांच्यासह शेकडो शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेक कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त करत आष्टी मतदार संघात अधिकारी कर्मचारी यांना पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत.न्यायव्यवस्था भ्रष्ट झाली आहे.असा आरोप कार्यकर्तांनी केला आहे.











