बीड (रिपोर्टर)ः-तीन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर काल बीड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. पावसात वारं असल्याने या वार्यांने उंच वाढलेला ऊस, मका, कडोळ, कापूस इत्यादी पिकं काही ठिकाणी पडली आहे. त्यामुळे शेतकर्यांचं नुकसान झालं. बीड तालुक्यातील धरणं भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. दोन महिन्यामध्ये दमदार पाऊस तालुक्यामध्ये झाला नसल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही.
बीड जिल्ह्यामध्ये जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्यांनी पेरण्या केल्या. जुलैमध्ये पाऊस पडला. ऑगस्टमध्ये पावसाने उघडीक दिल्याने शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागून होते. काल जिल्हाभरात पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी धो-धो तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याने खरीप पिकांना जिवदान मिळालं आहे. बीड तालुक्यात पुर्वी पासूनच हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत राहीला. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली नाही. धरणं भरण्यासाठी तालुक्यात जोरदार पावसाची गरज आहे. वादळी वार्यात काही ठिकाणी खरीप पिकाच नुकसान झालं. उंच वाढलेला उस, मका, कडोळ, कापूस इत्यादी पिकं भुई सपाट झाल्याने शेतकर्यांचं नुकसान झालं आहे.