बीड (रिपोर्टर) सातत्याने होणारा विजेचा लपंडाव ,अपुर्या सुविधा महावितरण अधिकारी कर्मचार्यांचे दुर्लक्ष या मुळे शेतकर्याना विजेचे काम स्वतःला करावे लावत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे . शेतातील पिकांना वेळेत पाणी देण्यासाठी शेतकरी जीवावर उदार होऊन हे काम करतात मात्र महावितरण कंपनीला याचे देणे घेणे नाही . यामुळेच काल दोन तरुनांना आपला जीव गमवावा लाकला असं म्हणत माजी मंत्री तथा आ धनंजय मुंडे यांनी या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक, हे समोर आले पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.अशीमागणी केली आहे
या बाबत अधिक माहिती अशी कि धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील दोन शेतकरी तरुणांनाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला या दुःखद घटनेवर शोकप्रकट करत प्रतिक्रिया देताना आ धनंजय मुंडे म्हणाले कि बीड जिल्ह्यातील भोगलवाडी (ता.धारूर) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील टिक टॉक वरून प्रसिद्धीस आलेला संतोष मुंडे व त्याच्या सोबतच्या आणखी एका तरुणाचा विजेच्या ट्रान्सफॉर्मर वरील फ्यूज जोडताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन अपघात घडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समजले. एका गरीब शेतकरी कुटुंबातील संतोषने ग्रामीण भाषा, सहज विनोद व देहबोलीचा कलात्मक वापर करून प्रसिद्धी मिळवली होती. दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.शेतकर्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुर्या सुविधा यामुळे सतत बरीच अशी कामे पर्याय नसल्याने आपला जीव धोक्यात घालून स्वतः करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक, हे समोर आले पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.