गेवराई येथील कृषी प्रदर्शनात उद्या स्व.गणेशराव बेद्रे किसान कृषिरत्न पुरस्काराचे वितरण; रिपोर्टरचे उपसंपादक मजीद शेख यांना उत्कृष्ट वार्ता लेखन पुरस्कार
गेवराई (रिपोर्टर) येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर सहकार्य करणाऱ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने नियुक्त झालेल्या युवा सरपंचाचा ही विशेष गौरव करण्यात येणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महेश बेदरे व स्वागताध्यक्ष शिनुभाऊ बेदरे यांनी केले आहे. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून डॉ.ज्योती मेटे, कृषी सहसंचालक डॉ.डी.एल. जाधव, राजेसाहेब देशमुख, माजी आमंदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, रॉयल शेतकरी गणेश फरताडे, गंमत भंडारी, दिलीप खिस्ती, शेख तयंब, संतोष मानूरकर,गणेश सावंत, बालाजी मारगुडे, भागवत तावरे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या किसान कृषी रत्न पुरस्काराचे यंदाचे मानकरी हे अण्णासाहेब जगताप माजलगाव, शिंदे बाळासाहेब धोंडराई, कनपुरे नारायण गेवराई, वजीर रशीद ब्रह्मगाव, गव्हाणे जयदीप, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड कृषी शास्त्रज्ञ, रॉयल शेतकरी गणेश फरताडे, उत्कृष्ट कृषी वार्ता लेखन पुरस्कारासाठी उपसंपादक मजीद शेख, पत्रकार सखाराम शिंदे, अशोक खिसाडे पांढरवाडी, शेतकरीपुत्र डॉ उद्धव घोडके यावर्षीचे मानकरी आसून मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने नियुक्त झालेल्या युवा सरपंचाचा ही विशेष गौरव करण्यात येणार असून या पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महेश बेदरे व स्वागताध्यक्ष शिनुभाऊ बेदरे यांनी केले आहे.
रिपोर्टरचे उपसंपादक मजीद शेख यांना उत्कृष्ट वार्ता लेखन पुरस्कार
गेवराई येथील कृषी प्रदर्शनात कृषिरत्न पुरस्कार सोहळ्यात शेतीविषयक लेखनाबद्दल विशेष लेखन करणारे सायं.दै.रिपोर्टरचे उपसंपादक शेख मजीद यांचाही उत्कृष्ट कृषी वार्ता लेखन पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.