बीड (रिपोर्टर): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिनी यशवंत सेनेच्या वतीने अहमदनगरचे नामांतर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे निदर्शने करण्यात आले. धनगर समाज बांधवांची ही मागणी राज्य सरकारने तात्काळ मान्य करावी नसता राज्यभरामध्ये तिव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी जिल्हाधिकार्यांना याबाबत निवेदन दिले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगरला देण्यात यावे अशा आशयाची मागणी केल्या कित्येक वर्षांपासून राज्य आणि केंद्र सरकारकडे धनगर समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. सातत्याने धनगर (पान 7 वर)
समाज बांधवांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आले आहे. आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी राज्यातील काही जिल्ह्यांचे नामांतर केले आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अद्यापही केले नाही. त्यामुळे संतापलेल्या समाज बांधवांना सोबत घेवून यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी बीड जिल्हाधिकार्यांसमोर जन आंदोलन उभा करत सरकारच्या नितीविरोधात निदर्शने केली. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी जोरदार मागणी केली. समाज बांधवांची मागणी मंजूर न झाल्यास राज्यभर तिव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी भारत सोन्नर यांनी दिला.