किल्ले धारूर (रिपोर्टर): धारूर शहरांमध्ये असलेल्या अनेक समस्या तशाच आहेत त्या सोडवले गेलेले नाहीत यामुळे नागरिक परेशान असून यासाठी धारूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आजपासून नगरपरिषदेसमोर विविध समस्या सोडवाव्यात यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
धारुर शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाणी समस्या, स्वच्छता समस्या अशा अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे परंतु या समस्येकडे ना लोकप्रतिनिधींना , ना प्रशासन यांचे लक्ष आहे. सर्व कारभार नगरपरिषदेचा राम भरोसे चालत असून अनंत अडचणींना धारूर शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे समस्या सुटत नसल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी 9 ऑगस्ट आज क्रांती दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे आम्ही हे उपोषण सर्व समस्या सोडवल्याशिवाय सोडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या उपोषणामध्ये सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव , शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत