बीड (रिपोर्टर) जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढी विषाणू संसर्ग साहित्य खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी लातूरच्या उपसंचालक कार्यालयाकडे गेल्यानंतर लातूर आणि मुंबईतील आरोग्य विभागाच्या पथकाने चौकशी केलेल्या अहवालामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.जयश्री बांगर आणि रक्तपेढीतील अधिकारी डॉ.बांगर यांचे बंधू गणेश बांगर हे दोषी आहेत असा अहवाल मुंबई येथील संचालक विभागाच्या पथकाने नुकताच राज्य सरकारकडे दिला आहे.
आरोग्य विभागाच्या कर्मचार्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याकडे असतानाही बीड जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमीतता झालेली आहे. रक्तपेढीतील विषाणू संसर्ग विभागात काहीखरेदी विक्री केलेली आहे. ती ही अव्वाच्यासव्वा दराने. डॉ.राठोड, डॉ.बांगर आणि गणेश बांगर यांनी केली होती. याबाबत अनेक तक्रारी तत्कालीन जिल्हाशल्यचिकत्सक आणि लातूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळीच्या जिल्हाशल्यचिकित्सकांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे लातूर आणि मुंबई येथील आरोग्य विभागाच्या दोन पथकाने स्वतंत्रपणे चौकशी केल्यानंतर डॉ.सुखदेव राठोड हे रक्तपेढीवर नियंत्रण ठेवण्यात आणि खरेदी विक्रीवरही नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी झालेले आहेत. अशा प्रकारचा ठपका ठेवण्यात येवून त्यांना विषाणू संसर्ग विभागातील खरेदी विक्रीचे साहित्य जे अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केली आहे त्याबाबत डॉ.राठोड, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.बांगर आणि त्यावेळचे डॉ.बांगर यांचे बंधू गणेश बांगर यांना या पथकाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरवल्यानंतर आरोग्य विभाग या तीन अधिकार्यांवर कोणती कारवाई करते? याबाबत आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचर्यांचे लक्ष लागून आहे.