धनगरांना एस.टी. चे प्रमाणपत्र द्या नाहीतर एकही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही
-भारत सोन्नर
हातात पिवळे झेंडे, प्रचंड घोषणाबाजी करत धनगर समाजाचा आक्रोश
बीड (रिपोर्टर): धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अशा गगनभेदी घोषणा देत बीड जिल्ह्यातला धनगर समाज आज रस्त्यावर उतरला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हातात पिवळे झेंडे घेत समाज बांधवांनी आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा या वेळी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व यशवंत सेनेचे भारत सोन्नर यांनी केले. राज्यामध्ये आरक्षणाचे लढे मोठ्या प्रमाणावर उभारलेले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतचा शब्द दिला होता. मात्र तो आजपावेत पाळलेला दिसून येत नसल्याने धनगर समाज अधिक आक्रमक झाला आहे. धनगरांना एसटीचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, नसता एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा यशवंत सेनेचे भारत सोन्नर यांनी यावेळी दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज हा अनुसूचित जमाती (एस टी) मध्ये समाविष्ट आहे केवळ धनगढ या चुकीच्या उच्चारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज या आरक्षणापासून वंचित राहिला आहे म्हणून आज धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने आरक्षण मागणीसाठी चालू आहे या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन ठोस आश्वासन दिले होते की इतर राज्यात धनगर समाजाचा एस टी च्या सवलती मिळतायत त्याच प्रमाणे शासनाचे एक शिष्टमंडळ इतर राज्यामध्ये जाऊन धनगर समाजाचा आरक्षनाचा अहवाल देऊन आरक्षणाची अमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते आज 50 दिवसाचे अल्टीमेटम देऊनही मुदत संपली आहे तरीही या सरकारने कुठलेही ठोस पाऊले अरक्षणासाठी उचलले गेले नाही म्हणून या सरकारचा आज धनगर समाजाच्या वतीने या सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला आपल्या प्रशासनाच्या मार्फत या सरकारला इशारा देण्यात येतो की येणार्या काळात धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला नाहीतर या सरकार मधले मंत्री महाराष्ट्रातले आमदार खासदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही यांच्या घरासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन आंदोलन करण्यात येईल या सरकारच्या विरोधात दिसून येत आहे धनगराच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आमच्या एस टी चे प्रमाणपत्र देण्यात यावे नसता येणार्या काळात हा महाराष्ट्रातील धनगर समाज पेटून उठेल याचे सर्वस्वी जबाबदारी हे सरकार असेल असा इशारा धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी दिली आहे या आंदोलनात हजारोच्या संख्येने बीड जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते येणार्या काळात आरक्षण तीव्र करण्यासाठी टप्पा टप्प्याने आंदोलने करण्यात येणार आहे अशी माहिती भारत सोन्नर यांनी आंदोलनादरम्यान समाजबांधवांना दिली आहे