संभाजीनगर (रिपोर्टर): संभाजीनगर येथे धनगर आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी संभाजीनगर कोकनवाडी येथे आरक्षण मागणीसाठी वैद्य व त्यांचे सहकारी आमरण उपोषनास बसले आहेत आज 6 दिवस झाले आहे तरी देखील या उपोषण कर्त्याची कुठल्याही सत्ताधारी पुढार्यांनी भेट घेतली नाही याचे संताप धनगर समाजबांधवांमध्ये दिसून आले उपोषण कर्त्यांना धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी भेट दिली असता समाजबांधवांना मार्गदर्शन करताना भारत सोन्नर म्हणाले या सरकारने आम्हाला 50 दिवसाचे आल्टीमेंटम दिले होते की धनगर आरक्षणाची अमलबजावणी करण्यात येईल परंतु 50 दिवस उलटूनही झाले पुन्हा परत शिंदे सरकारने अजून एक समिती स्थापन करून 3 महिने इतर राज्यात जाऊन आरक्षणाची माहिती घेऊन अहवाल आल्यानंतर आरक्षणाची अमलबजावणी करन्यात येईल परंतु हे सरकार आरक्षण प्रश्नासंदर्भात चालढकल करीत आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपण समिती काय स्थापन करताय मेंढपाळांसोबत दोन दिवस राहिल्यावर त्यांच्या व्यथा कळतील उपेक्षित असणार्या वंचित असणार्या डोंगर दर्यात रानावनात भटकंती करणार्या या धनगरांना कधी आपण आरक्षणाचा लाभ देणार आहात याची या सत्ताधार्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी आमचा संयम आमचा अंत पाहू नका आम्ही शांत आहोत तोपर्यंत आहोत एकदा आमची सटकली की आमची काय ताकत आहे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2014 च्या निवडणुकीत काय झाले हे माहीत आहे आपण सत्तेवर केवळ धनगर समाजाच्या मतांमुळे सत्तेत बसलात आपण दिलेले आश्वासनाची पूर्तता करा आरक्षण जर आपल्या सरकारने दिले तर हा धनगर समाज डोक्यावर घेऊन नाचेल येणार्या काळात महाराष्ट्रभर आरक्षण मिळेपर्यंत पेटत ठेवा आपला हक्क मिळविण्यासाठी ताकतीने आंदोलनात सहभाग नोंदवा असे धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी संभाजीनगर येथे समाजबांधवांना संबोधले.