बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई अधिक भेडसावू लागली आहे. दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली. 193 गावे, 152 वाड्या टंचाईच्या विळख्यात आल्या असून या ठिकाणी 235 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जावू लागलाय. मे एन्डपर्यंत हा आकडा आणखी मोठा होऊ शकतो. काही मोजक्या धरणातच पाणीसाठा शिल्लक राहिला. इतर सर्व धरणे कोरडे पडल्याने टँकरमध्ये पाणी भरायचे कुठून? असा प्रश्न प्रशासनाला पडू शकतो. जमीनीतील पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी आणि बोअर कोरडे पडले.
मराठवाड्यामध्ये यंदा भीषण दुष्काळा सामोरे जावे लागत आहे. पाऊस कमी पडल्याने सर्वत्र टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू लागल्या. जिल्ह्यातील काही ठराविक धरणातच 25 ते 30 टक्के या दरम्यान पाण्याचा साठा शिल्लक राहिला. इतर धरणामध्ये पाणी नाही. विहिरी, बोअरचे पाणी कमी झाले, काही विहिरी तर शंभर टक्के कोरडे पडले. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागले. 193 गावे व 192 वाड्यात पाण्याची टंचाई असून या ठिकाणी 235 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एप्रिल आणि मे असे दोन महिने कडक उन्हाळ्याचे आहेत. या दोन महिन्यात आणखी टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
254 विहीरी अधिग्रहीत
टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना आखत आहे, ज्या विहीरींना आणि बोअरला पाणी चांगले आहे त्याचे अधिग्रहण करून त्या ठिकाणावरून नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे. बीड जिल्ह्यातील 254 विहीरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.