अंबाजोगाई (रिपोर्टर): विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी कोणीच नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे पाठीमागील गेट तोडून घरात प्रवेश करत घरामधील कपाटे तोडून तब्बल 33 लाख रुपये नगदी व 15 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास शेपवाडी येथे घडली. या घटनेने अंबाजोगाई शहरात प्रचंड खळबळ उडाली असून चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगण्यात येते. घरफोडीची ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी डेरेदाखल होत श्वानपथकाला पाचारण करून चोरांचा तपास सुरू केला आहे. सदरची घटना ही अंबाजोगाई शहरातील मोंढा भागात पत्र्याचे व्यापारी असलेले विष्णू शेप यांच्या घरी घडली.
शहरापासून जवळच असलेल्या मौजे शेपवाडी येथील रहिवासी तथा अंबाजोगाई शहरातील मोंढा भागातील पत्र्याचे व्यापारी विष्णू शेप यांचा मुख्य रस्त्यालगत बंगला आहे चोरट्यांनी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गेटचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले 33 लाख रुपये नगदी तसेच पंधरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिन्याची चोरी करून फरार झालेच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
काल संध्याकाळी विष्णू शेप आपल्या कुटुंबासह शेपवाडी येथील घराच्या शेजारी असलेल्या परिचय मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी घराला कुलूप लावून रात्री आठ वाजता गेले असता घरात कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्यानी विष्णू शेप यांच्या घरात प्रवेश केला घरातील तिन्हीही बेडरूम मधील कपाटाची दरवाजे तोडून त्यात असणारी नगदी रक्कम तसेच सोन्याच्या दागिनेसह रकमेची चोरी करून चोरटे पसार झाले लग्न समारंभ आटोपून रात्री साडेदहा पावणे अकरा वाजता घरी विष्णू शेप कुटुंबासह घरी आले असता गेटचे कुलूप तुटलेले पाहून त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. घरातील सर्व कपाटे तोडून नगदी रक्कम व सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकाश विष्णू शेप यांनी आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात जाऊन लेखी फिर्यादी दिली त्यात एकूण 33 लाख 20 हजार रुपये नगदी रक्कम तसेच सोन्याचे दागिने अंदाजीत 15 लाख रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद पोलिसांनी दाखल करून घेतली आहे या चोरीत दोन चोरट्यांचा समावेश असून बंगल्याच्या मागील बाजूने त्यांनी प्रवेश केला व जाताना त्याच मार्गाने परत गेल्याचे चोरटे सीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. इतर सराईत गुन्हेगार रात्री बारा वाजण्याच्या नंतर चोरी करतात मात्र रात्री आठ वाजता एवढी मोठ्या घरफोडीची चोरीची घटना घडल्याने गुन्हेगारावर पोलिसांचा धाक राहिला नाही का ?असाही सवाल जनतेतून केला जातोय पोलिसांनी श्वानपथक तसेच एलसीबीच्या पथकाला पाचारण केले आहे चोरीचा तपास लावणे ही अंबाजोगाई शहर पोलीसा समोर मोठे चॅलेंज आहे चोरीचा तपास लागतो की इतर चोरी प्रमाणे चोरीचा तपास सुरू आहे असे पोलिसाकडून सांगितले जाते पहावे लागेल.