बीड (रिपोर्टर)ः- बीड शहरातील तेलगांव नाका परिसरात असलेल्या गांधीनगर , नूर कॉलनी येथे गेल्या काही दिवसापासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरीकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विजेच्या प्रश्नासंदर्भात नागरीक संबधीत विभागाच्या इंजिनअरला फोन करतात मात्र त्यांनी मोबाईल बंद करुन ठेवला आहे. तक्रार नेमकी कोणाकडे करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी केली जावू लागली.
बीड शहरालगत असलेल्या गांधी नगर परिसरात विजेचा संदर्भात नेहमीच तक्रारी असतात. कधी डि.पी. खराब होतो तर कधी उच्च दाबाने विज येते तर काही वेळा होलटेज कमी असते. सदरील हा विजेचा बिगाड दुरूस्त करण्याकडे विज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करतात. गेल्या काही दिवसापासून तर विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरीकांसह व्यापारी त्रस्त झाले आहे. गांधीनगर परिसरात अनेक व्यापार्यांचे व्यवसाय विजेवर अवलंबून असल्याने विजच टिकत नसल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. विजेचा संदर्भात या भागातील इंजिनीअर यांना नागरीक फोन करतात. मात्र ते फोन बंद करुन अज्ञात स्थळी बसले आहे. अधिकारीच जर फोन बंद करुन बसत असतील तर तक्रारी तरी नेमक्या कोणाकडे करायच्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी घालावे व विजेची गैरसोय दुर करावी अशी मागणी गांधीनगर परिसरातील नागरीकांसह व्यापार्यांकडून होत आहे.