बीड (रिपोर्टर): सर्वसामान्यांच्या कोटयवधी रुपयांच्या ठेवी परत न देता शाखा बंद ठेवणार्या ज्ञानराधा, साईराम, छत्रपती, जिजाऊ मॉ साहेब, लक्ष्मीमाता, राजस्थानी मल्टिस्टेटमध्ये मोठी अफरातपर झाली असून सर्वसामान्यांची फसवणूक करणार्या या सर्व मल्टिस्टेटची एसआयटीमार्फत चौकशी करा, मल्टिस्टेटच्या संचालक मंडळासह कार्यकारी मंडळ, व्यवस्थापक, कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. या सर्व मल्टिस्टेटच्या संचालक मंडळांची स्थावर मालमत्ता विक्री करण्यात येऊ नये, याबाबत दुय्यम निबंधकांना पत्र द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षभराच्या कालखंडात बीड जिल्ह्यातून ज्ञानराधा, साईराम, छत्रपती, जिजाऊ मॉ साहेब, लक्ष्मीमाता, राजस्थानी या मल्टिस्टेट को.ऑपरेटिव्ह बँकांनी सर्वसामान्य ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना चुना लावला आहे. सर्वसामान्यांनी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी पै पै जमा करून त्यांच्याकडे ठेवी ठेवल्या,मात्र या सर्व मल्टिस्टेट बँकांना आज कुलूप लागले आहे. ते लोकांचे पैसे देत नाहीत. त्यामुळे आज उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर आपल्या पदाधिकार्यांसमवेत जिल्हा उपनिबंधकांकडे गेले, त्या ठिकाणी निवेदन देत या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करत या बँकांच्या अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व त्यांची स्थावर मालमत्ता विकता येणार नाही, याबाबत दुय्यम निबंधकांना लेखी पत्र द्यावे, व ठेवीदारांचे पैसे तात्काळ मिळवून द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर,वाहतूक सेना जिहा अध्यक्ष मशरू पठाण,जिल्हा समन्वयक संजय महादवार् ,जिल्हा संघटक नितीन धांडे, उप जिल्हा प्रमुख, हनुमान जगताप,आशिष मस्के, सुशील पिंगळे,तालुका प्रमुख गोरख सिंघन,वाहतूक , पठाण, शिवसेना युवानेते, गजानंन कदम इत्यादी उपस्थित होते.