किल्ले धारूर (रिपोर्टर) : धारूर तालुक्यातील जाहीर मोहा येथील मुंजा हरिराम मुंडे यांच्या गाय व चार शेळ्यांचा विजेची तार अंगावर पडल्याने आज सकाळी मृत्यू झाला आहे यामुळे शेतकर्याचे कुटुंब उघड्यावर आले असून त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की धारूर तालुक्यातील जहागीर मोहा येथील शेतकरी मुंजा हरिराम मंदिर हे आज सकाळी साडेनऊ वाजता गाय व चार शेळ्या घेऊन शेतात निघाले होते शेतात जात असताना अचानकपणे विजेची मेन तार तुटून गाय व चार शेळ्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ते शेतकर्याचे कुटुंब आता उघड्यावर आले आहे अगोदरच दुष्काळ आणि त्यात आता हा आर्थिक भार असे नुकसान यामुळे शेतकर्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे याचा पंचनामा करून शासनाने या शेतकर्याला त्वरित मदत करण्याची मागणी होऊ लागली आहे या घटनेने धारूर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शेतकर्याला मदत करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. वीज वितरण कंपनीचा ढिसाळ कारभाराने नेहमीच अशा घटना घडत आहेत.