जिल्ह्यात 40 उमेदवार फिरतात, मग हा अनुभव माझ्याच वाटेला का?
माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नाहीत
माझ्या विरुद्ध षडयंत्र
मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ
बीड (रिपोर्टर):beed reporter मागच्या वेळेसही माझा ताफा अडवून अशी घोषणाबाजी करण्यात आली होती आणि हा प्रकार आता दुसर्यांदा झाला. हे मराठा आंदोलक असूच शकत नाहीत. कारण आंदोलक हे चर्चा करण्यासाठी तयार असतात. हा तर प्रायोजीत कार्यक्रम असल्याचे पंकजा मुंडे pankaja munde यांनी सांगितले. कोणत्याही समाजाला एकमेकांच्या अंगावर घालणार्या कार्यक्रमात मी सहभागी झाले नाही. मी कोणत्णया समाजाचा द्वेष केला नाही. मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण नक्की मिळेल, असा शब्द मी मराठा बांधवांना दिला आहे. beed बीड जिल्ह्यात 40 उमेदवार फिरत आहेत, मग हा अनुभव माझ्याच वाट्याला का? हे पाहून मन छिन्न-विछिन्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर आमचाच हक्क असं काही राजकीय पक्षांना वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले. आज ते माध्यमाशी बोलत होत्या.
माजलगाव तालुक्यात प्रचारासाठी गेल्यानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवला होता आणि त्यांच्यासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली यावरच पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून मागच्या वेळी पण माझा ताफा अडवून अशी घोषणाबाजी करण्यात आली होती आणि हा प्रकार दुसर्यांदा झाल्याने हे मराठा आंदोलन असू शकत नाहीत कारण आंदोलन हे चर्चा करण्यासाठी तयार असतात हा तर प्रायोजित कार्यक्रम असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. कोणत्याही समाजाला एकमेकांच्या अंगावर घालणार्या कार्यक्रमात मी सहभागी झाले नाही मी कोणत्याही समाजाचा द्वेष केला नाही मराठा समाजाला कोर्टात टिकणार आरक्षण नक्कीच मिळेल असा शब्द मी मराठा बांधवांना दिला आहे मात्र हे प्रकार वारंवार घडत असल्याने मी भावुक झाले असल्याच पंकजा मुंडे म्हणाल्या
बीड जिल्ह्याचे सोशल फॅब्रिक जीर्ण करण्याचं मोठं षडयंत्र कोणी रच्र हे माहीत नाही मात्र यापूर्वी बीड जिल्ह्यात असं कधीच झालं नव्हतं बीड जिल्ह्यामध्ये 40 उमेदवार फिरतात मग आरक्षणाच्या मागणीवरून हे अनुभव माझ्याच वाट्याला का येतात त्यामुळे माझं होत आहे मी कोणत्याच घटनेचा फायदा घेऊन कोणत्याही समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माझा ताफा अडवला जातो त्यामध्ये 14 , 15 वर्षाची मुलं असतात हे पाहून देखील मनभाऊक होतं मुलांमध्ये जातीपातीची लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार सुरू आहेत त्याचा मतावर जास्त परिणाम होणार नाही राजकारणी म्हणून आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याचा काही राजकीय पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत तर मनोज जणांके पाटील यांनी गरीब मराठा बांधवांसाठी उभा केलेल्या आंदोलनावर आमचाच हक्क आहे असं काही राजकीय पक्षांना वाटतं मात्र आपल्या आंदोलनाचा असा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी त्यांनी सावध भूमिका घ्यायला हवी ज्या जिल्ह्यामध्ये आरक्षणाचा आंदोलन सुरू झालं तो जिल्हा शांत आहे मात्र हे सगळं बीड जिल्ह्यामध्येच का होत आहे असा देखील प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.










