पहाटे दोन वाजता घडली घटना
माजलगाव, (रिपोर्टर): तालुक्यातील घळाटवाडी येथील ऊसतोड मजुर असलेल्या पती-पत्नी सह दोघांना गोळीबार करून अपहरण केल्याची घटना मंगळवारी पहाटे 2 वाजता घडली. यातील दोघांना सोडून दिली असून दोघेजणांचे अपहरण केले.
घळटवाडी येथील रहिवासी असलेले संतोष रतन शिंदे यांचा मुलगा सचिन संतोष शिंदे व त्याची पत्नी चंपाबाई सचिन शिंदे हे येडेश्वरी येथील कारखान्याला ऊस तोडणी साठी गेले होते. त्यांना पैसे न दिल्यामुळे ते काही दिवसापूर्वी कारखान्याहून परत आले होते. ते आपल्या राहत्या घरी रात्री झोपलेले असताना रात्री 2 वाजता दोन जीपीमधुन काही लोक आले व त्यांनी गोळीबार करून व रिवाल्वर लावून अनिल संतोष शिंदे , सचिन संतोष शिंदे , चंपाबाई सचिन शिंदे , तायाबाई शिंदे यांना जीपमध्ये टाकून घेऊन गेले. यातील अनिल व तायाबाई यांना त्यांनी रस्त्यातच सोडून दिले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
सचिन व चंपाबाई या पती-पत्नीचे अपहरण केले . याप्रकरणी गावकर्यांनी ग्रामीण पोलिसा संपर्क करून ही माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती घेतली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की , हा प्रकार ऊसतोडीतून झाला असून या ठिकाणी गोळीबार झालेला नाही व त्यांचे अपहरण झाले असे म्हणता येणार नाही असे सांगितले.