;बीड, (रिपोर्टर)ः- महाळसजवळा येथील पाणंद रस्त्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अविनाश खांडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे दिसुन येत आहे.
म्हाळसजवळा येथील सर्व्हे नं.14 गट नं,58मध्ये 0.93 आर शेत जमीन असुन सदरील जमीनीमध्ये जाण्यासाठी पुर्वीपासुन पाणंद रस्ता आहे. परंतु शेजारील गटाच्या शेतकर्यानी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याने शेताकडे जाण्यासाठी दुसरा रस्ता शिल्लक नाही. रस्त्यावर अतिक्रमण केल्याने शेतीच्या मशागतीचा व शेतमाल कापुस, सोयाबीन या मालाच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. रस्ता उपलब्ध करू देण्यसाठी अविनाश खांडे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. त्यांची प्रकृती खालावली असुन या आंदोलनाकडे वेळीच लक्ष द्यावे नसता शासनाच्या विरोधात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांनी दिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल असे ही म्हंटले आहे.