शेतकर्यांचा संसार उघड्यावर आला ; मदत मिळवून देण्याचे डॉ.ज्योती मेटेचे आश्वासन
बीड रिपोर्टर): गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे . यात मागील आठवड्यात झालेल्या गारपीटमुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. यात आता क दि 17 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्या मुळे शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे जनावरे दगावली , झाडे उन्मळून पडली तर काही जणांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. यात शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आज शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी त्यांनी शेतकर्यांना दिलासा देत शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्याची बाबत संबंधित तलाठी तहसीलदार यांना समक्ष सूचना दिल्या.
काल अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व गारपीट यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले . वीज पडून शेळ्या – म्हैस दगावली गेल्याच्या काही घटना घडल्या . तसेच जोराच्या वार्याने मोठ-मोठी झाडे उमळून पडली . घरावरील पत्रे उडून गेले . गोरगरिबांचा संसार उघड्यावर आला . याचा सर्वाधिक तडाका बीड तालुक्यातील नाळवंडी महसूल मंडळाला बसला या भागाची पाहणी डॉ. ज्योती मेटे यांनी केली यावेळी उपस्थित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ पंचनामे करून योग्य ती कारवाई करून नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना यावेळी केल्या तसेच तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून चर्चा करत झालेल्या नुकसानाची कल्पना दिली आणि प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या.पहिले मित्र संपवू नंतर शत्रूकडे पाहू, असेही सुरेश नवले म्हणाले.