• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठ्यांनी शासक आणि प्रशासक दोन्ही बनलं पाहिजे”-मनोज जरांगे पाटील

by गणेश सावंत
October 2, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड : ऑनलाईन रिपोर्टर

नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा जंगी उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला स्पष्ट संदेश दिला – “आरक्षण मिळवूनही आता थांबायचं नाही, शासन-प्रशासनात आपले टक्के वाढवायचे आहेत. मराठ्यांनी शासक आणि प्रशासक दोन्ही बनलं पाहिजे.”

“मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, पण लेकरांना आरक्षण मिळालेलं पाहायचं आहे”

आपल्या भाषणात जरांगे पाटील भावूक झाले. ते म्हणाले – “मी आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना आरक्षण मिळालेलं मी बघणार. पण मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. त्यामुळे एकजुटीने राहा. ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे.”

ते पुढे म्हणाले की, हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर लागू झाल्यानंतर अख्खा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. “मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी संघर्ष करून एक कोटी लोकांना आरक्षणात घातले आहे. उरलेल्यांना देखील त्यांचा हक्क मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत”

जरांगे पाटलांनी काही राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले – “आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत. हे लोक फक्त टीव्हीवर बोलतात, मोठ्या गाड्यांत फिरतात. पण ४० वर्षांत समाजाला काही दिलं नाही. उलट आपल्यातूनच काही गद्दार पुढे आले.”

ते पुढे म्हणाले की, “आपल्या जातीचं खरं काम प्रशासनातले अधिकारीच करून दाखवतात. सत्ता असो वा नसो, अधिकारी असेल तर खुटा ठोकून ठेवतो. म्हणून आता मराठा समाजाने आपल्या मुला-मुलींना अधिकारी बनवलं पाहिजे.”

“शासक आणि प्रशासक दोन्ही बना”

जरांगे पाटलांनी प्रशासनाच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले – “प्रशासनात एवढी ताकद आहे की, मोठा नेता असला, गुंड असला तरी त्याला प्रशासनासमोर हात जोडावे लागतात. त्यामुळे मराठ्यांनी अधिकारी बनलं पाहिजे. त्याचबरोबर शासकही बनलं पाहिजे. समाजाला दारिद्र्याचा गंज काढायचा असेल, जातीला संभाळायचं असेल, तर आपण शासक-प्रशासक दोन्ही बनायला हवं.”

“टंगळमंगळ बंद करा, चतुर व्हा”

भविष्यातील लढ्यासाठी त्यांनी समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले. “मी आणि माझ्या समाजाने सरकारच्या मुंडक्यावर पाय ठेवून थोडं थोडं मिळवलं आहे. आता पुढे टंगळमंगळ बंद केली पाहिजे. चतुर राहून, डोकं लावून मराठ्यांनी शासक आणि प्रशासक बनलं पाहिजे,” असे ते म्हणाले.

या मेळाव्यात जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून मराठा समाजाच्या आगामी वाटचालीचा स्पष्ट आराखडा मांडला – “आरक्षण मिळालंय, आता प्रशासनात वर्चस्व मिळवायचं आहे.”

पॉईंट टू पॉईंट जरांगे पाटील

मराठा आरक्षण (Maratha Reservation) लागू झाल्यानंतर आम्हाला गुलाम म्हणता, गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता, मग इंग्रज काय तुमच्या घरचे होते का? असा परखड सवाल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विचारला. आमच्या पोराबाळांचा पाणउतार करण्यासाठी, जातीता अपमान करण्यासाठी यांना 30 वर्षे निवडून दिले का? असा प्रश्न विचारत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे (Pankaja Munde), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना टोला लगावला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मुंडे बंधूंवर टीका केली.

आपल्याला गुलाम म्हणणाऱ्यांसाठी काम कशाला करता?

राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत मनोज जरांगे यांनी त्यावर टीका केली. ते म्हणाले की, “त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅझेट आहे. मी त्यांना काहीही बोललो नाही. मी बोलायला सुरू केलं तर काय होईल. लोकाच्या लेकराबाळाला तुच्छ समजू नका. गुलामाचं गॅझेट लागू केलं म्हणता, आमच्या लेकांना गुलाम समजता काय? अशा लोकांच्या सोबत काम करणारे मराठ्यांच्या पैदाशी कोण कोण आहेत? तुमच्या जातीला गुलामीची औलाद म्हणाले, त्यांचा प्रचार करतो काय? पाच-दहा लाखांसाठी कशाला चाटता? आम्ही जर गुलाम आहोत तर मराठ्यांनो, त्यांच्याकडे कशाला काम करता?

: कशाला कुणाच्या पायाखाली काम करता?

आमचं गुलामीचं गॅझेट आहे तर मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का? मग इंग्रजांनी केलेल्या 1931 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण घेतला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? आम्ही बिघडलेल्या रक्ताचं नाही. तुम्ही तिकडून अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडे निझामाची चाकरी करायला लागला असं आम्ही म्हणायचं का? पण आम्ही तसं म्हणत नाही असं मनोज जरांगे म्हणाले.

आम्ही कुणाला घाबरत नाही. माजलेल्यांना नीट करायची ताकद आमच्यात आहे. यांनी आपल्या जातीवर बरंच बोललं, आम्हाला पण सगळं बोलता येतं. पण आता मापात राहा. तुम्ही असं बोलण्यासाठीच मराठ्यांनी तीस वर्षे निवडून दिलं का? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.

यांना निवडणुकीत खपाखप पाडा

मनोज जरांगे म्हणाले की, “हे बदलणारे नाहीत. त्यामुळे दया माया जरा कमी करा. मराठ्यांच्या विरोधात जे कोण उभा राहतील त्यांना खपाखप पाडा. जेव्हा असं होईल त्यावेळी ते मराठ्यांसोबत चांगलं राहतील. तुमच्या लेकरांना गुलाम म्हटलं, मग ते तुमच्या लेकरांपेक्षा मोठे आहेत का?”

: ओबीसी समाजाला दोष नको

आजपासून कधीच ओबीसी समाजाला दोष द्यायचा नाही. ओबीसींची समाजाचा काही संबंध नाही. याच्यात काही नेते आहेत. सगळ्या माळी समाजाचा दोष आहे का? ते छगन भुजबळ बावचाळले आहे. त्यामुळे काही नेते यामध्ये बोलतात असं मनोज जरांगे म्हणाले.

Previous Post

“साहेब गेल्यानंतर बहिणीने मेळाव्याची परंपरा जिवंत ठेवली, याचा अभिमान” – धनंजय मुंडे

Next Post

पोलीस दुसर्‍याची बायको घेवून फिरता होता

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

पोलीस दुसर्‍याची बायको घेवून फिरता होता

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?