विनायकरवजी मेटे साहेब हे एक महाराष्ट्रातील संघर्षशील नेते होते. आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी कायम लढा उभा करून मराठा समाजाच्या रास्त मागण्या अत्यंत कुशलतेने सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या अशा अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. त्यांच्या या अपघाती निधनाने महाराष्ट्र राज्याने एक संघर्षशील नेतृत्व गमावलं असून मेटे कुटुंबियांच्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आसल्याची भावना गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली.